
Views: 13561
महाराष्ट्राला वेगळी समृद्धी देणाऱ्या महामार्गाच्या प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. समृद्धी महामार्गाचे अखेरच्या टप्प्यातील कामही संपले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग आता पूर्ण झाला आहे. महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम आहे संपले आहे. त्यामुळे आता नागपूर मुंबई हा प्रवास केवळ आठ तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. पूर्वी या प्रवासासाठी 16 तासांचा कालावधी लागायचा. मात्र आता ही वेळ कमी होणार आहे. अलीकडेच समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह या महामार्गावरून प्रवास केला होता.

समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग चर्चेत आला होता. त्यानंतर या महामार्गावर पडणाऱ्या अपघातांबाबत उपाय करण्याचे आदेश देण्यात आले होते. अद्यापही या महामार्गावरील अपघातांची संख्या कायम आहे. अलीकडेच या महामार्गावर अनेक चर्चा की वाहने पंक्चर झाली होती. आता या महामार्गाचे शेवटच्या टप्प्यातील काम आहे पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई आणि नागपूर या दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे.
High Speed कायम
समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते मुंबई या टप्प्याचे काम प्रगतीपथावर होते. सुमारे 76 किलोमीटरचा मार्ग बांधण्यात येत होता. आता हे काम पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी हा मार्ग गेम चेंजर ठरणार आहे. समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पासाठी डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. गायकवाड यांच्यावर यापूर्वी देखील अनेक प्रकल्पांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. विक्रमी वेळेत गायकवाड यांनी अनेक प्रकल्प पूर्ण केले होते. त्यामुळे समृद्धी महामार्गाची जबाबदारी देखील गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी गायकवाड यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
गायकवाड सध्या वांद्रे-वर्सोवा सी लिंक, ठाणे खाडी पूल आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत आहेत. चांगल्या कामासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आला. त्यांनी समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करीत देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकार केले आहे. 701 किलोमीटर लांबीचा आणि 6 लेनचा महामार्ग देशातील सर्वात हाय-टेक एक्सप्रेसवे आहे.
समृद्धी महामार्गावर ताशी दीडशे किलोमीटर वेगाने वाहने जाऊ शकतात. या मार्गावर 65 उड्डाणपूल, 24 इंटरचेंज, 6 बोगदे, 30 इंधन केंद्रे, 21 रुग्णवाहिका आहेत. या मार्गावरील 8 किलोमीटर लांबीचा हाय-टेक ट्विन बोगदा जर्मन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. वन्यजीवांना महामार्ग ओलांडण्यासाठी 100 पेक्षा अधिक अंडरपास तयार करण्यात आले आहेत. महामार्गाच्या आसपास असलेल्या राज्यातील 24 जिल्ह्यांचा वेगाने विकास यामुळे शक्य होणार आहे. 18 स्मार्ट सिटी तयार करण्याचा प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. समृद्धी महामार्गामुळे याचाही लाभ होणार आहे.