महाराष्ट्र

निवडणुकीतील पराभवावरून Nana Patole, Sanjay Raut टार्गेट

काँग्रेस नेते Vijay Wadettiwar यांनी केली टीका

Share:

Author

विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीमध्ये अद्यापही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. या प्रभावावरून पुन्हा एकदा आघाडीतील घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस मधून प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना पुन्हा एकदा विरोध सुरू झाला आहे. यासंदर्भात विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा जागा वाटपाबाबत संशय व्यक्त केला.

सगळेच संशयास्पद

प्रसार माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाली की, महाविकास आघाडी मधील जागा वाटपाबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बराच विलंब केला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील असाच उशीर केल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. अनेक दिवसांपर्यंत जागा वाटपावर निर्णय घेण्यात आला नाही. जे काम दोन दिवसांचे होते, त्यासाठी अनेक दिवस लावण्यात आले. अनेक मुद्द्यांवर नेत्यांनी तोडगाच काढला नाही. बैठकीला देखील वेळेचे पालन करण्यात आले नाही, असेही ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्र्यांसाठी Devendra Fadnavis यांच्यासोबत एकत्र आले नेते

निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी मधील काँग्रेसने ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी गट सक्रिय झाला आहे.

एकूणच जागा वाटपाची प्रक्रिया संशयास्पद होती, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीला मदत होईल अशा पद्धतीने जागावाटप करण्यात आले का? असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यामुळे निवडणुकीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये भविष्यात संघर्ष बघायला मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या विरोधात आता विजय वडेट्टीवार यांनीच आता नाना पटोले यांच्यावर टीका केल्याने काँग्रेसमध्ये आता नेत्यांची टक्कर बघायला मिळेल, असं दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले अनेक नेते सध्या तक्रार करीत आहेत. काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पूर्व विदर्भातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील कोर्टात गेले आहेत. नागपूर शहरातून काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश उर्फ बंटी शेळके यांनी देखील नाना पटोले यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. नाना पटोले यांच्या इशाऱ्यावरूनच आपला पराभव झाला, असा शेळके यांचा आरोप आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता पटोले विरोधात युद्ध पेटेल, असे चित्र निर्माण झाले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!