महाराष्ट्र

केंद्र बदलल्यानं Chandrapur मध्ये तरुणांना भुर्दंड

नोकरी भरतीमुळे District Bank पुन्हा वादात

Author

चंद्रपूर जिल्हा सध्या मध्यवर्ती बँक नोकर भरतीमुळं वादात सापडली आहे. अनेक दिवसांपासून ही भरती चचेत आहे. आता बँकेचे परीक्षा केंद्र बदलण्यात आलं आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भरती प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं या नोकर भरतीवरून काँग्रेसचा टार्गेट केलं होतं.एका कंपनीच्या माध्यमातून ही नोकर भरती करण्यात येत आहे. संपूर्ण भरती प्रकियात वादात सापडली होती. या भरतीला निवडणूक विभागानं स्थगिती दिली होती. निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशात बँकेच्या लिपिक आणि शिपाईपदाच्या ऑनलाइन परीक्षेत पहिल्याची दिवशी बिघाड झाल्याने केंद्र बदलण्यात आले. त्यामुळं परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमदेवारांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला.

ऐनवेळी केंद्र बदल्यात आल्यानं परीक्षार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. दत्ता पौळ यांनी याप्रकरणी टीका केली आहे. नोकर भरतीच्या या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ होत असल्याचा आरोपही पौळ यांनी केला आहे. परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोपही त्यांनीक केला आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नव्या कंपनीच्या माध्यमातून ही नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात पौळ यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत.

नागपूरच्या विकासाला दिशा; Chandrashekhar Bawankule यांच्या निर्णयांनी प्रकल्पांना वेग

आचारसंहितेमुळं अडथळा

जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला आचारसंहितेमुळं थांबविण्यात आलं होतं. आता प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानंतरही घोळ कायम आहे. बँकेची नोकरभरती परीक्षा प्रक्रिया राबवणारी कंपनी बोगस आहे. परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न देखील चुकीचे होते. चुकीच्या प्रश्नांबाबत आक्षेप घेण्यात आले होते. आक्षेप घेतल्यानंतरही काहीच कार्यवाही झाली नाही. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी कंपनीकडे विचारणा केली. मात्र त्यांनाही शंकांचे निरसन करता आलं नाही, असे सांगण्यात आलं.

परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर आयटीआय कंपनीने गुण वाढवून दिले नाही. परीक्षा प्रक्रिया सुरू असताना 21 डिसेंबरला संगणकात घोळ झाला. त्यामुळं 22 डिसेंबरला जालना केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर 29 डिसेंबरला जालना केंद्र असताना नांदेड येथे परीक्षा घेण्यात आली. त्यामुळं जालनावरून परीक्षार्थींना नोंदडला जावं लागलं. कंपनीनं उत्तर पत्रिकेत कोणतेही बदल केले नाहीत. परीक्षेनंतर अवघ्या 23 तासांच्या आत निकाल लावला. आता तातडीनं मुलाखती सुरू करण्यात येणार आहेत.

बँकेची ही संपूर्ण परीक्षाच गैरप्रकार असल्याचं दत्ता पौळ म्हणाले. लिपिक पदाच्या परीक्षेत आपल्याला 65 गुण मिळाले. त्यांच्या मित्राला 57 गुण आहे. मात्र त्यांना मुलाखतीला बोलावण्यात आले नाही, असंही पौळ म्हणाले. आयटीआय कंपनीचे हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल बंद आहेत. त्यामुळं आता या भरती प्रक्रियेच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचंही पौळ यांनी स्पष्ट केलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!