आमदार डॉ. परिणय फुके यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत उमरेड-करंडला अभयारण्य परिसरातील बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत बैठक घेतली.
पूर्व विदर्भाच्या हृदयात जिथे निसर्गाची रंगभूमी फुलते, जिथे वनराईची हिरवी चादर आकाशाला स्पर्श करते, त्या भूमीच्या रक्षणासाठी आणि तेथील माणसांच्या न्यायासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. परिणय फुके (दादा) यांनी एकदा पुन्हा आपली तत्परता दाखवली आहे. राजकारण असो वा समाजकारण, विकास असो वा पर्यावरण संरक्षण – दादा यांच्यासाठी हे सर्व केवळ कर्तव्य नव्हे, तर अंतःकरणात रुजलेली भावना आहे. जनसामान्यांच्या मनात ते ‘दादा’ म्हणूनच ओळखले जातात, कारण त्यांच्या प्रत्येक कृतीतून सामान्य माणसाची काळजी स्पष्ट दिसते. यंदा दादांनी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलले. राज्याचे वनमंत्री माननीय गणेश नाईक यांच्या विधानभवनातील दालनात त्यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील उमरेड-करंडला अभयारण्य परिसरातील बाधित गावांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक घडवून आणली.
पूर्व विदर्भात प्रचंड जैवविविधता आहे. अनेक अभयारण्ये या प्रदेशाला शोभा देतात. मात्र या अभयारण्यांचा विस्तार होत असताना स्थानिक ग्रामस्थांना कुठेही अन्याय होऊ नये, त्यांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने व्हावे, त्यांना न्याय्य मोबदला मिळावा आणि त्यांचे जीवन सुधारावे, यासाठी डॉ. परिणय फुके यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत अधिसूचित गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेवर, मोबदल्याच्या रकमेवर आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
दर आठवड्याला प्रोग्रेस
बैठकीत दादांनी बाधित ग्रामस्थांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली. वनमंत्र्यांनी देखील दादांच्या प्रयत्नांना पूर्ण साथ दिली. बाधित ग्रामस्थांच्या मोबदल्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मंत्री महोदयांनी दिले. पुढील सहा महिन्यांत पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित नागरिकांना न्याय देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, कामाच्या प्रगतीवर सातत्याने नजर ठेवण्यासाठी दर आठवड्याला आढावा बैठक घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
डॉ. परिणय फुके यांचे हे कार्य केवळ एका बैठकीपुरते मर्यादित नाही. पूर्व विदर्भाच्या विकासासाठी, निसर्ग संरक्षणासाठी आणि स्थानिकांच्या उन्नतीसाठी ते सतत सक्रिय असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे अभयारण्ये जशी समृद्ध होत आहेत, तसेच त्या परिसरातील ग्रामस्थांचे जीवनही सुखी आणि सुरक्षित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जनतेच्या हितासाठी सतत धावणारे ‘दादा’ यांचे हे कार्य पुढेही अशाच गतीने आणि समर्पणभावनेने चालू राहील असा विश्वास स्वतः त्यांनी व्यक्त केला.
