महाराष्ट्र

जखमी वाघ काय करू शकतो Amit Shah यांना दाखविणार

Uddhav Thackeray म्हणाले, मराठी माणसाला कमी लेखू नका 

Post View : 21

Author

के.जी.एफ चित्रपटातील “घायल शेर की सासे उसकी दहाड से ज्यादा भयानक होती है”, हा डायलॉग सर्वांना माहितीच असणार. अशाच काही शब्दांत उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर टीका केली. 

शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तीव्र टीका करत “जखमी वाघ” म्हणून स्वत:ची प्रतिमा उभी केली. “मराठी मानूस” कमी लेखू नका, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी शिवसेनेच्या संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जोरदार हल्लाबोल केला.  

गुरुवारी, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित सभेत बोलताना ठाकरे म्हणाले, “अमित शाह म्हणाले होते की या निवडणुका मला माझी जागा दाखवतील. पण आता त्यांना ‘जखमी वाघ’ आणि त्याचे पंजे काय करू शकतात, ते दाखवण्याची वेळ आली आहे.”

ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह; मतपत्रिकांवर निवडणुकीचे आव्हान  

महाविकास आघाडीचा (एमव्हीए) पराभव झाल्यानंतर, ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवरही सवाल उपस्थित केला. “जर तुम्हाला थोडीशी सुद्धा लाज असेल, तर ईव्हीएम बाजूला ठेवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या,” असा थेट इशारा त्यांनी दिला. ईव्हीएमवरील अविश्वास व्यक्त करताना, त्यांनी सांगितले की निवडणुकीत पारदर्शकता असणे आवश्यक आहे.

भंडाऱ्यातील Blast नंतर मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी कागदी मतपत्रिकांवर परत जाण्याच्या सूचनेला अनावश्यक आणि प्रतिगामी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटले की, “आमच्या हिंदुत्वाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. जो कोण हिंदू-मुस्लिम शत्रुत्व पसरवतो, तो खरा हिंदू असू शकत नाही.”

महाराष्ट्र निवडणुकीतील पराभव आणि पुढील रणनीती  

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने २३५ जागांसह दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या नेतृत्वाखालील या आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश होता. दुसरीकडे, एमव्हीए आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेसला केवळ 16 जागा, शिवसेना (यूबीटी) ला 20 जागा, आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या.  पराभवामुळे व्यथित असलेल्या महाविकास आघाडीने ईव्हीएमच्या वैधतेवर शंका व्यक्त केल्या. ठाकरे म्हणाले, “महायुतीला विजय मिळालाय, पण तो कसा मिळाला, हे महाराष्ट्राला ठाऊक आहे.”  

शिवसेना (यूबीटी) च्या पुढील रणनीतीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ही फक्त सुरुवात आहे. मराठी स्वाभिमानासाठी आणि हिंदुत्वाच्या पवित्रतेसाठी आम्ही लढत राहू. महाराष्ट्राच्या जनतेने वेळोवेळी आपले मत दिले आहे, आणि भविष्यातही मराठी मानूस एका नवीन इतिहासाची निर्मिती करेल.” उद्धव ठाकरे यांच्या या गर्जनेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेनेच्या पुनरागमनाची नांदी दिसत आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!