
महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाचे नवे अध्याय उलगडत आहेत; फडणवीसांना एकनाथ शिंदेकडून हवी दुरी हि बाब चर्चेत आहे.
महाराष्ट्राचे राजकारण हे आता लोकांना फारसं नव राहिलेले नाही. मात्र महाराष्ट्राच्या याच राजकारणात कधीच पाहिला नव्हता असा कुतूहलजनक व उलथापालथीचा संघर्ष आता उलगडत आहे. महायुती सरकारमध्ये सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात सुसंवादाची कमतरता दिसून आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, भाजप आता शिंदेंना बाजूला करण्याच्या तयारीत आहे. फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातील काही नेत्यांशी चर्चा केल्याने हा संभ्रम अधिकच गडद झाला आहे.
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर भाजप आपली भूमिका मजबूत करण्यासाठी नव्या समीकरणांकडे वळू शकते. त्यामुळे शिंदे गट आता राजकीय एकाकीपणाच्या उंबरठ्यावर आहे. महायुतीत सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचा फटका एकनाथ शिंदेंच्या महत्त्वाकांक्षी योजनांना बसत आहे. शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना अचानक थांबवण्यात आली आहे. त्याचबरोबर आनंदाचा सिद्धासारखी योजना देखील धोक्यात आहे.

गडचिरोलीत जवानाला वीरगती; Devendra Fadnavis होतील आणखी कठोर?
पत्रं आलं समोर
उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांचे एक पत्र नुकतेच समोर आलेत. ज्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले आहेत. हे पाहता, शिंदे गटाला जाणीवपूर्वक बाजूला सारले जात असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत एकनाथ शिंदे सतत मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकींना अनुपस्थित राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्प पूर्व चर्चेलाही त्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे महायुती सरकारमध्ये काहीतरी गडबड असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
एकनाथ शिंदेंच्या या वागण्यावरून असे दिसते की, ते भाजपच्या भूमिकेवर नाराज आहेत. फडणवीस आणि शिंदे यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत आहेत. भाजपला स्वतःच्या हातात संपूर्ण सत्ता हवी असून शिंदे गट हा त्यांच्या योजनेत अडथळा ठरत आहे, प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजप शिंदे गटाच्या नेत्यांचे फोन टॅप करत आहे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.
मनोधैर्य कमी?
मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी ते लढत आहेत का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपकडून त्यांच्यावर वाढता दबाव आणि सत्ता गमावण्याची भीती या सगळ्या घडामोडींना वेग देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळाचे कौतुक केले. त्यांच्या प्रशासनिक शैलीबद्दल स्तुती करताना पवारांनी अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीत नवा वाद निर्माण केला आहे. संजय राऊत यांनी या घटनेवर कडाडून टीका करत हा कार्यक्रम भाजप आणि संघ (RSS) समर्थित असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतही अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.
आगामी महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिंदे गट यांच्यातील तणाव वाढल्यास शिंदेंना बाजूला केले जाऊ शकते. त्याच वेळी शिवसेना (UBT), मनसे आणि इतर पक्ष आपापल्या पद्धतीने राजकीय समीकरणे जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपने जर शिंदे गटाला बाजूला करण्याचा निर्णय घेतला, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी हा गोंधळ अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. आता पाहावे लागेल की, एकनाथ शिंदे यांची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने जाते.