महाराष्ट्र

जीएसटी घेऊन म्हणते भिकारी; Nana Patole यांचा सरकारवर हल्लाबोल

कृषिमंत्री Manikrao Kokate यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे Political वातावरण तापले 

Author

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाले आहे. आता नाना पटोले यांनी सरकारला पुन्हा धारेवर धरले आहे. 

शेती ही भारताच्या अर्थव्यवस्थेची रीढ आहे. शेतकरी कष्टाने आपल्या घामाच्या थेंबाने देशाला पोसतात. मात्र अनेकदा त्यांनाच संकटांचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात उध्वस्त होते. या जोखमीपासून संरक्षण मिळावे म्हणून पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाते. अशात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोकाटे यांच्या विधानांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले होते की, भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, परंतु आम्ही एक रुपयात पिक विमा योजना शेतकऱ्यांना देत आहोत. या वक्तव्या भरून नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप आणि त्याच्या सहयोगी पक्षांचे सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

कृषिमंत्र्यांनीच केली देशाच्या पोशिंद्याची भिकाऱ्याशी तुलना

शेतकऱ्यांचा अवमान

सत्तेच्या मस्तीने बेफाम झालेल्या भाजप नेत्यांकडून वारंवार शेतकऱ्यांचा अवमान केला जात आहे. कधी त्यांना आंदोलनजीवी म्हटले जाते, कधी अतिरेकी व नक्षलवादी ठरवले जाते, तर आता थेट ‘भिकारी’ म्हणत त्यांचा अपमान करण्यात आला आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेले वक्तव्य हे अशाच सत्तेच्या गुर्मीतील एक उदाहरण आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी कोकाटे यांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. त्याचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांना सत्ता गाजवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे नाना पटोले म्हणाले आहेत.  कोकाटे यांनी तात्काळ शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.

फडणवीस सरकारचा Big Move शब्द दिला तो पाळलाच

भाजपवर घणाघात

पटोले पुढे म्हणाले, शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. त्याच्या घामाने हा देश उभा राहतो. त्याच्या कष्टावर संपूर्ण अर्थव्यवस्था चालते. असे असताना, भाजपचे मंत्री शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. भाजप सरकार फक्त धनदांडग्यांसाठी काम करते. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नावाखाली फसवले जाते, शेतीसाठी लागणाऱ्या खते, बियाणे आणि इतर कृषी साहित्यांवर 18 टक्के जीएसटी लावला जातो. म्हणजे सरकारच शेतकऱ्यांकडून पैसे उकळते आणि वरून त्यांनाच ‘भिकारी’ म्हणते, असेही पटोले म्हणाले.

भाजपने निवडणुकीत शेतकऱ्यांना मोठी मोठी आश्वासने दिली. कर्जमाफीचे गाजर दाखवले, हमीभाव देण्याचे नाटक केले. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. “शेतकऱ्यांच्या नावाने भाजप सरकार मतांची भिक मागते आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांनाच भिकारी म्हणते. हा अपमान शेतकरी सहन करणार नाही,” असा घणाघात नाना पटोलेंनी केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!