महाराष्ट्र

भंडारा जिल्हा परिषदेत Nana Patole यांनी केला गेम

विषय समिती सभापती खाते वाटपानंतर पसरली नाराजी

Share:

Author

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यानंतर नाना पटोले यांचं प्रदेशाध्यक्ष पद गेलं आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसमध्ये नाराजी आहे. आता भंडारा जिल्ह्यातही त्यांच्या बद्दल नाराजी वाढली आहे.

भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक अलीकडेच पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष पद आपल्याकडं राखण्यात काँग्रेसला यश आलं. त्यानंतर काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महायुतीला धूळ चारली. विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीतही काँग्रेसनं बाजी मारली. त्यानंतर विषय समिती सभापतींना खातेवाटप करण्यात आलं. खाते वाटपानंतर मात्र पटोले यांच्या विरोधात नाराजी पसरली आहे. पटोले यांनी धोका दिल्यामुळं भंडारा जिल्ह्यातील एक समाज संतापला आहे. पटोलेंनी आपल्याशी दगा केल्याचा आरोप आता या समाजाकडून केला जात आहे. पटोले यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोपही होत आहे.

सुमारे 62 वर्षांनंतर भंडारा झेडपीला अनुसूचित जमातीमधील अध्यक्ष मिळाला आहे. कविता उईके या अध्यक्ष झाल्या आहेत. उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ फेंडर हे निवडून आलेत. त्यानंतर सभापती पदाच्या निवडणुकीत मात्र महायुती फुटली. त्यामुळं आता जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. आता खाते वाटपानंतर नाना पटोले यांच्या विरोधात नाराजी पसरली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 21 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ 13 आहे. भाजप जवळ 12 सदस्य आहेत. शिवसेना आणि बीएसपीजवळ प्रत्येकी एक सदस्य आहे. चार सदस्य अपक्ष आहेत. अशात काँग्रेसनं महायुतीला धक्का दिला.

कलम 370, राम मंदिर, तीन तलाकचे कनेक्शन असलेले ज्ञानेश मोठ्या पदावर

वचनाचे पालन नाही

आमदार नाना पटोले यांच्यावर निवडणुकीत विश्वास ठेवला. परंतु त्यांनी विश्वास घात केला. भंडाऱ्यातील एका समाजाकडून हा थेट आरोप आता होत आहे. सभापतींना खाते वाटप केल्यानंतर तर ही नाराजी तीव्र झाली आहे. खाते वाटपात आरोग्य व अर्थ विभाग आनंद मलेवार यांच्याकडे गेला आहे. बांधकाम आणि शिक्षण विभाग नरेश ईश्वरकर यांच्याकडं सोपविण्यात आला आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती अनिता नलगोपूलवार झाल्या आहेत. कविता राऊत या समाज कल्याण सभापती झाल्या आहेत. खाते वाटप करताना नाना पटोले यांनी ‘गेम’ केल्याची चर्चा आता आहे.

नाना पटोले यांनी ‘के फॅक्टर’कडं लक्ष दिलं. आपलं हित साधण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक ‘टी फॅक्टर’ वर अन्याय केल्याचा आरोप आहे. पटोले यांनी अत्यंत विचारपूर्वक ही खेळी खेळल्याचा आरोप आता केला जात आहे. परिणामी आता भंडारा जिल्ह्यातूनही नाना पटोले यांना नाराजीचा फटका बसणार आहे. नाना पटोले यांनी जिल्हा परिषदेत वर्चस्व मिळावलं. परंतु एका समाजाला खोलवर दुखावल्याची टीका आता उघडपणे केली जात आहे. पटोले यांच्यापासून अलीकडच्या काळात अनेक जण दुखावले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आली. शिवसेना पटोले यांच्यापासून नाराज आहे. काँग्रेसमध्येही पक्षांतर्गत नाराजी आहे.

अलीकडेच काँग्रेसनं नवीन प्रदेशाध्यक्ष नेमला. त्याऐवजी नानांना गटनेतेपद हवं होतं. हे पद काँग्रेसनं नानांना दिलेलं नाही. नाना यांच्या विरोधात चौफेर नाराजी वाढत आहे. असं असताना नानांनी भंडाऱ्यात यात भर घातली आहे. खाते वाटपानंतर भंडाऱ्यातील ‘टी फॅक्टर’ दुखावला आहे. या नाराजीतून नानांच्या पाठीमागे शनी पीडा तर लागली नाही ना‌? अशी चर्चा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!