अकोला शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत सोनू करोसिया यांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. या दुःखद प्रसंगी आमदार रणधीर सावरकर यांनी कुटुंबाला भेट देऊन संवेदनेचा हात दिला आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
अकोला शहरातील जुना कपडा बाजार चौक परिसरात 27 सप्टेंबरला मुसळधार पावसाने थैमान घातले. नाल्याला आलेल्या पुराच्या तडाख्यात दुर्गा चौक, देशमुख फाईल येथील रहिवासी सोनू कन्नू करोसिया यांना आपला जीव गमवावा लागला. तीन दिवसांच्या अथक शोधानंतर त्यांचा मृतदेह अकोल्यापासून 120 किलोमीटर अंतरावरील मानेगाव येथील पूर्णा नदीच्या पात्रात आढळला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली. अशा दुखाच्या क्षणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री आणि विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी करोसिया कुटुंबाच्या घरी भेट दिली. त्यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीत शोकाकुल वातावरणात सर्वांनी सोनू करोसिया यांच्या आत्म्याला शांतीसाठी श्रद्धांजली अर्पण केली. आमदार सावरकर यांनी कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या दुखात सहभाग दर्शवला. त्यांच्यासोबत महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, महानगर सरचिटणीस ॲड. देवाशिष काकड, माजी उपमहापौर राजेंद्र गिरी, माजी नगरसेवक राहुल देशमुख, युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले, प्रकाश घोगलिया, माजी नगरसेवक अमोल गोगे, सुनील बाठे, अविनाश पथरोड आणि रोहित डागोर उपस्थित होते. या सर्वांनी कुटुंबाला मानसिक आधार देत एकजुटीचे दर्शन घडवले.
Chandrashekhar Bawankule : खोटे कुणबी प्रमाणपत्र जारी केल्यास कारवाई
मानवतेचा सूर
सावरकर यांनी या प्रसंगी कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. त्यांनी शासन स्तरावर कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी सर्व शक्य ते सहकार्य करण्याचा शब्द दिला. या भेटीने कुटुंबाला दुखाच्या काळात आधार मिळाला. तसेच समाजातील संवेदनशीलतेचे प्रतीक दिसून आले. उपस्थित सर्वांनी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. ज्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला.
IPS Ravindra Singhal : महिला पोलिसांसाठी सुरु झाले ‘चिमणीघर’
सोनू करोसिया यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आमदार सावरकर आणि भाजप नेत्यांच्या या भेटीने कुटुंबाला केवळ मानसिक आधारच नाही, तर भविष्यातील कठीण काळात साथ मिळेल, याची खात्री मिळाली. शासन आणि समाज यांच्या एकजुटीने कुटुंबाच्या दुखावर मलम लावण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, अशी प्रार्थना सर्वांनी केली. ही भेट सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली.
