
गाठीशी असलेले उच्च शिक्षण, विधिमंडळातील कायद्याचा अभ्यास, सामान्यांना न्याय देण्यासाठी असलेली तळमळ अन् पदाच्या दुरुपयोगाच्या विरोधात बुलंद केलेला आवाज आणि शेरोशायरी. भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांचं आगळं वेगळे रुप यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिसलं.
विधिमंळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून भाजपचे नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषद चांगलीच गाजवली. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या पाठीशी राहण्याची घोषणा फुके यांनी केली. राज्यपालांचे अभिभाषण आणि अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी विधान परिषदेत दमदार शाब्दिक फलंदाजी केली. पूर्व विदर्भातील राइल मिल मालकांना एलएक्युची धमकी देत होणाऱ्या खंडणी वसुलीलाही डॉ. फुके यांनी पुराव्यांसह ‘एक्स्पोज’ केलं.
राज्यातील काही उद्योगांनी एमआयडीसीतील जमिनी बळकावून ठेवल्या आहेत. अशांविरुद्धही डॉ. फुके यांनी आवाज बुलंद केला. सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून चमकोगिरी करणाऱ्यांना वठणीवर आणण्याची गळही आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली. फुकेंच्या मागणीमुळेच मुख्यमंत्री फडणवीस सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शिस्तीच्या कायद्यात आवश्यक ती दुरूस्ती करण्याची घोषणा केली.

शेतकऱ्यांसाठी लढा
शेतरस्ते, शेतकऱ्यांना मोफत वीजेचा प्रश्न याकडेही डॉ. फुके यांनी यंदाच्या अधिवेशनात सरकारचं लक्ष वेधलं. ऑनलाइन गेमिंग जुगाराविरुद्धही त्यांनी एल्गार पुकारला. महायुती सरकारच्या विरोधात खोटं नेरेटिव्ह पसरविणाऱ्यांनाही त्यांनी आडव्या हातांनी घेतलं. औरंगजेबाची कबर हटविण्याचा मुद्दा सध्या राज्यात तापला आहे. यावरही डॉ. फुकेंनी भाष्य केलं. नागपुरातील दंगलखोरांविरुद्धही त्यांनी कडक शब्दात प्रहार केला. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी सीसीआयचा मुद्दाही त्यांनी विधान परिषदेच्या पटलावर आणला. या मुद्द्यांनी अख्ख्या राज्याचं लक्ष वेधलं.
महाराष्ट्रातील माओवादाचेही डॉ. फुके यांनी कठोर शब्दात एन्काऊंटर केलं. कारागृहांमधील रिक्त पदांचा विषयही त्यांनी मुद्देसूदपणे उपस्थित केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी देखील आमदार डॉ. परिणय फुके यांनी सरकारकडं आग्रह धरला. विधिमंडळातील विधान परिषदेचं सभागृह भाजपच्या या नेत्यानं चांगलंच गाजवलं. फुके यांच्या प्रत्येक मुद्द्यात यंदा वेगळंपण ठळकपणे जाणवलं. अर्थसंकल्पावर भाष्य करताना त्यांचा शायराना अंदाजही दिसून आला. ‘समस्याओं के बारे में सोचने पर सिर्फ बहाने मिलते है. समाधान के बारे में सोचने पर रास्ते मिलते है. जिंदगी आसान नही होती. खुद को मजबूत बनाता पडता है. उत्तम समय कभी खुद नही आता. समय को उत्तम बनाना पडता है’, असं नमूद करीत आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपलं चौफेर वक्तृत्व कौशल्य दाखवून दिलं. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपच्या या नेत्याचं आगळंवेगळं रुप बघायला मिळालं.