
महिला सक्षमीकरणाला चालना देत, मंत्री अदिती तटकरे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील महामार्गांवर दर 25 किलोमीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छता गृह उभारले जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणांतर्गत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील महिलांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज स्वच्छता गृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत, राज्यातील प्रमुख महामार्गांवर दर 25 किलोमीटर अंतरावर आधुनिक स्वच्छता गृह उभारली जाणार आहेत. ही सुविधा महिलांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. त्यांच्या प्रवासातील गैरसोयींचा मोठ्या प्रमाणावर निरास होणार आहे.

अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सोयीसाठी राबविण्यात येणारी ही योजना संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे. महिलांना प्रवासादरम्यान शौचालयाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या स्वच्छता गृहांची देखभाल आणि व्यवस्थापन स्थानिक महिला बचत गटांकडून केले जाणार आहे. यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच महिला उद्योजकतेला चालना मिळेल.
Farmers Loan Waiver : उपमुख्यमंत्र्यानंतर फडणवीसांचा शिक्कामोर्तब
हक्कांचे संरक्षण
योजनेद्वारे केवळ स्वच्छतेच्या सुविधांमध्ये वाढ होणार नाही, तर महिलांना आर्थिक स्वावलंबनही मिळणार आहे. या स्वच्छता गृहांच्या देखभालीची जबाबदारी महिला बचत गटांना दिल्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. महिलांनी चालवलेल्या या सुविधा स्वच्छ आणि सुयोग्य राहतील, तसेच महिला प्रवाशांना याचा दीर्घकालीन लाभ मिळेल. महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे या बचत गटांना प्रोत्साहन दिले जाईल, तसेच महामार्गावरील त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जाणार आहे. आधुनिक आणि सुसज्ज असलेल्या या स्वच्छता गृहांमध्ये महिला व मुलींसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध असतील. सुरक्षितता लक्षात घेऊन या केंद्रांमध्ये सीसीटीव्ही आणि देखरेखीची विशेष यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यामुळे महिलांना सुरक्षित आणि निर्भय प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
Nagpur : मोदींच्या आगमनाने गर्दीचा महापूर, नागपूर मेट्रो देणार प्रवासात सुरूर
धोरणाच्या अंमलबजावणीस गती
राज्य सरकारच्या चौथ्या महिला धोरणांतर्गत महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेवर भर दिला जात आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि आधुनिक स्वच्छता गृह निर्माण करणे हा या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळे महिलांना प्रवासादरम्यान स्वच्छ आणि सुसज्ज सुविधांचा लाभ मिळेल. ही योजना राज्यातील महिलांसाठी दिलासादायक ठरणार आहे. त्यांना स्वच्छतेसह सुरक्षिततेचा विश्वास मिळणार आहे.
अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू झालेली ही योजना महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठा टप्पा ठरणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नवीन स्वच्छ आणि सुरक्षित भविष्य घडणार आहे. महिलांच्या गरजा लक्षात घेऊन शासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच स्तुत्य आहे.