महाराष्ट्र

Congress : गोंदियात नानांचा ‘हात’ गेला निसटून, ‘कमळ’ आलं फुलून

Parinay Fuke : राहुल ठवरेंचा काँग्रेसला रामराम

Share:

Author

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

राजकारणात बदल हा नित्याचा भाग असतो, पण काही प्रसंग असे असतात की ज्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरणे बदलतात. असाच एक मोठा धक्का महाराष्ट्राच्या राजकारणात बसला आहे. हा धक्का काँग्रेसला पार हलवून टाकणारा आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या गडाला तडा गेला. श्याम ठवरे यांचे सुपुत्र डॉ. राहुल ठवरे यांनी काँग्रेसला हाथ दाखवत, भाजपचा कमळ हाती घेतला. हा सर्व सोहळा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद सदस्य माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.

विशेष म्हणजे, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्या बालेकिल्ल्यात हा भूकंप झालाय. त्यांचे समर्थकही आता एकमेकांकडे पाहत अब क्या होगा? असा प्रश्न विचारत आहेत. राहुल ठवरे यांच्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही हाथ से हाथ छोड़ो अभियान चालवत थेट भाजपमध्ये एन्ट्री घेतली. हा पक्षप्रवेश म्हणजे फक्त एका व्यक्तीचा निर्णय नाही, तर संपूर्ण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणारा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. काँग्रेस सोडणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत सन्मान नाही, कामाचा मान नाही अशी भावना बोलून दाखवली.

Akola : भाजपच्या गडातील शोभायात्रेचे साजिद खान करणार स्वागत 

कार्यकर्त्यांची नाराजगी

गेल्या काही वर्षांत पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यातच राहुल ठवरे यांच्या प्रवेशामुळे भाजपचे बळ वाढले आणि काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजप नेते डॉ. परिणय फुके यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन देत म्हटले, हम विकास की राजनीति करते हैं, दिखावा नहीं. अर्जुनी मोरगाव आणि गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रात भाजप आता मजबूत झाला आहे. भाजप नेहमीच विकासाचे राजकारण करतो आणि शेतकरी, कामगार, तसेच वंचित समाजघटकांसाठी न्याय मिळवून देतो, असेही ते म्हणाले.

भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे संघटन मंत्री बाळा अंजनकर यांनी भाजप हा कोणाच्याही घरचा पक्ष नाही, तर सामान्य कार्यकर्त्यांनी उभा केलेला पक्ष आहे, हे ठासून सांगितले. याचवेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी थेट हल्ला चढवत सांगितले, भाजपला बाहेरून कोणी हरवू शकत नाही. त्यांनी काँग्रेसमधील असंतोषाचा फायदा घेत ज्यांना पक्षावर नाराजी आहे, त्यांनी पक्षाच्या चिन्हाशिवाय निवडणूक लढवून दाखवावी असे खुले आव्हान दिले.

Nitin Gadkari : नेता असावा कुटुंबप्रमुखासारखा

राजकीय बदल

काही महिन्यांपूर्वीच आमदार नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर विधानसभा निवडणूक पराभवाची जबाबदारी टाकत अब बस, बहुत हुआ, असा सूर लावला होता. राजकीय धक्कादायक घडामोडींचे हे नाटक अजून संपलेले नाही. यामागे नेमके कोण जबाबदार आहे. आता या टीकेचे बाण कोणावर झाडले जातील? हे येणारा काळच ठरवेल. मात्र एक गोष्ट नक्की अबकी बार, अर्जुनी मोरगाव भाजप सरकार अशीच स्थिती दिसत आहे.

भाजपने दाखवलेली ताकद आणि राहुल ठवरे यांच्या पक्षप्रवेशाने स्थानिक राजकारणात मोठे उलथापालथ झाली आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनीही भाजप म्हणजे केवळ पक्ष नाही, तो विकासाचे उदाहरण आहे असे सांगत आगामी स्थानिक निवडणुकांसाठी तयार राहा, सज्ज व्हा असे आवाहन केले आता पाहायचं एवढंच की काँग्रेसचे उरलेसुरले सैनिक या धक्क्याला कसं पचवतात.

Vijay Wadettiwar : राज्यात गृहराज्यमंत्र्यांचाच खिसा कापला

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!