महाराष्ट्र

Nagpur : बाबासाहेबांचे संविधान पोहोचणार घरोघरी

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांनी दिला लोकशाहीचा संदेश

Author

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागपूरमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते घर घर संविधान मोहिमेचा शुभारंभ झाला.

संपूर्ण देशात 14 एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपुरात घर घर संविधान अभियानाला एक ऐतिहासिक सुरुवात झाली आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका नागपूर जिल्ह्यातील 10 लाख घरांमध्ये पोहोचवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना संविधानाची उद्देशिका घराघरात पोहोचवण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.

यामुळे संविधानाच्या महत्त्वाची जाणीव आणि त्याच्या मूल्यांची जपणूक होईल. समाजातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाचे ज्ञान मिळावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124  जयंती अवसरावर करण्यात आला. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियममध्ये झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार शामकुमार बर्वे आणि महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule : संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा चंबू

निधी वाटप

कार्यक्रमात समाज कल्याण विभागाने विविध योजनांचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचे लाभ वितरित केले गेले. यामध्ये रमाई आवास घरकुल, स्वाधार योजना, तृतीयपंथीयांना ओळखपत्र आणि विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रे यांचा समावेश होता. या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना राज्य सरकारने दिलेली मदत समृद्ध भविष्याची आशा घेऊन सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे विविध संस्थांना निधी वितरित केला. शांतीवन चिचोली येथील भारतीय बौद्ध परिषदेला 2 कोटी 47 लाख रुपये, कामठी येथील ओगावा सोसायटीला 5 कोटी 94 लाख  रुपये देण्यात आले.

गुरुचरण दास स्वामी मठाला 52 लाख 31 हजार रुपये आणि प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानला 7 कोटी 2 लाख  रुपयांचा निधी दिला. याव्यतिरिक्त, स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत मेघा इंटरप्रायजेसच्या श्रीमती माया मेश्राम यांना 5 लाख 3 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित स्थळांच्या जतनाचे महत्त्व सांगितले. त्यांनी अशा स्थळांना शक्तिस्थळे मानत, त्यांचे जतन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. शासनाकडून या स्थळांचे संरक्षण करण्यात येईल, हे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra : महावितरणचे रिजनल डायरेक्टर पद धोक्यात

शक्तिस्थळांचा नवा आयाम

नागपूरला आणि राज्यातील डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित स्थळांना यामुळे नवा आयाम मिळेल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. ही मोहीम भारतीय संविधानाच्या मूल्यांचे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक घरात संविधानाची उद्देशिका पोहोचवण्याच्या या उपक्रमामुळे समाजातील सर्व वर्गांमध्ये जागरूकता वाढवण्याची अपेक्षा आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशिका केवळ कागदावर नसून ती प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील मूलभूत अधिकारांची जाणीव करून देण्याचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे.

Praful Patel : भाईजींनी केलं महायुतीचा गेम करणाऱ्यांचे हौसले क्रॅश

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!