महाराष्ट्र

Akola Shiv Sena : भाजपचा गडी फोडला; थेट उपशहर प्रमुख करून जोडला

Political Change : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पक्ष बदल

Share:

Author

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जवळ येत असताना अकोल्यात भाजपमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये अडगळीत पडलेल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आता अस्वस्थता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी महापौर, नगरसेवक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारख्या नेत्यांनी भाजपसाठी काम केले नाही. अनेकांनी उघडपणे विरोध केला. त्यामुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही परिस्थितीमध्ये बदल न झाल्याने आता भाजपमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासून अगदी आतापर्यंत भाजपशी एकनिष्ठ राहणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करत शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.

भाजपमधील या कार्यकर्त्याला शिवसेना शिंदे गटाने थेट अकोला शहराचे उपशहर प्रमुखपद दिले आहे. भाजपमध्ये कधी काही बूथ प्रमुख, मंडळ अध्यक्ष आणि त्यानंतर कट्टर हिंदुत्वासाठी हिंदू जनजागरण समितीमध्ये काम करणाऱ्या या कार्यकर्त्याला शिंदे सेनेने आता आपले झेंड्याखाली घेतले आहे. भूषण इंदोरिया या कार्यकर्त्यांचे नाव आहे. भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कट्टर कार्यकर्ता म्हणून भूषण इंदोरिया अकोला भाजपमध्ये ओळखले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिथे अनेकांनी पक्षासाठी काम केले नाही, तिथे इंदोरिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपसाठी काम केले.

नेमका फरक काय पडणार?

भूषण इंदोरिया हे अकोला शहराच्या राजकारणातील छोटे नाव आहे. हा व्यक्ती सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. असे असले तरी भारतीय जनता पार्टी मधील प्रत्येक व्यक्ती भूषण इंदोरिया या नावापासून परिचित आहे. एक छोटासा कार्यकर्ता सोडून गेला म्हणून काय फरक पडणार? असा प्रश्न केला जाऊ शकतो. परंतु एक छोटेसे छिद्र देखील अख्खी नाव समुद्रात बुडवण्यासाठी हे विसरता येणार नाही. एखादी प्रचंड मजबूत इमारत पाडायची असेल तर बरेचदा त्याच्या पायाशी असलेली एक एक वीट काढली जाते. त्यातून इमारतीला कमजोर केले जाते. अशा सगळ्या विटा काढून झाल्यानंतर इमारतीला वाऱ्याची हलकी झोप देखील जमीन दोस्त करू शकते.

Devendra Fadnavis : पुढील नऊ वर्षांचे स्वप्न

भूषण इंदोरियाच्या रूपाने असेच एक चित्र अकोला भाजपच्या नावेमध्ये पडले आहे. एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून. कोणत्याही पक्षातून निष्ठावान कार्यकर्ता बाहेर पडणं हे त्या पक्षासाठी चांगलं लक्षण नसते. होणाऱ्या नुकसानाची सुरुवात आधी छोटीच असते. कालांतराने मोठे भगदाड पडते. अद्यापही अकोला भाजपमधील अनेक नेत्यांना ही बाब लक्षात आलेली नाही. इतकेच नव्हे तर प्रदेश आणि भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचे दुर्लक्षही त्यांना पक्षाचे काही देणेघेणे नसल्याचे सिद्ध करत आहे.

अकोल्यामध्ये काँग्रेसने भारतीय जनता पार्टी समोर मोठे आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची फारशी मदत भाजपला मिळत नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गट अकोल्यामध्ये भाजपच्या विरोधात ताकदीने मैदानात उतरला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडूनही भाजपला किती मदत होते हे सर्वांना माहित आहे. अशा परिस्थितीत एक एक करीत भाजपचे असे अनेक कार्यकर्ते बाहेर पडले तर काय होणार? अशी चिंता आणि चिंतन करण्याची वेळ आता भाजपवर आली आहे.

राजकारणामध्ये कोणालाही चिल्लर समजता येत नाही. कधी कधी असेच चिल्लर वाटणारे नाणे गेम पलटवणारे ठरून जाते. कधी कधी माचिसची एक काडी देखील मोठी आग लावण्यास कारणीभूत ठरते. भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते जर असेच बाहेर पडत राहिले, तर अकोल्यातील पक्षाचा अभेद्य गड कसा मजबूत राहील, हा खरा प्रश्न आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!