महाराष्ट्र

Pahalgam Attack : काँग्रेसची धोरणं ‘सर तन से जुदा’ वाली

BJP : काँग्रेस म्हणजे 'लष्कर ए पाकिस्तान'

Share:

Author

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधानांवर केलेली पोस्ट देशद्रोहाच्या सीमेलाच स्पर्श करते. शोकाच्या क्षणीही राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर उघड झाला आहे, अशी टीका भाजपने केली आहे.

पहलगाममध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे. अशात काँग्रेस पक्षाने देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करत एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आपली पाकिस्तानपुरस्कृत मानसिकता उघड केली आहे, असा हल्ला भाजपकडून करण्यात येत आहे. या कृत्यामुळे काँग्रेसवर संतप्त टीका होत असून, भाजपने या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

काँग्रेसने पोस्ट केलेल्या फोटोत एका कुर्ता-पायजमा घातलेल्या व्यक्तीचे डोके आणि हातपाय गायब दाखवण्यात आले आहेत. त्याखाली लिहिले होते ‘जबाबदारीच्या वेळी बेपत्ता’. ही प्रतिमा सरळसरळ ‘सर तन से जुदा’ या पाकिस्तानातील दहशतवादी घोषणेशी साधर्म्य दर्शवणारी आहे, असा घणाघात भाजपने केला. भाजपने यावर आक्रमक प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर आरोप केला की, हीच ती जहाल मानसिकता जी पाकिस्तानातील अतिरेक्यांच्या घोषणांमध्ये दिसते, तीच काँग्रेसच्या विचारांमध्येही आहे.

पाकिस्तानला दिले बळ

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे म्हटले की, काँग्रेसने देशद्रोही भूमिकेतून पंतप्रधानांचा अवमान करत पाकिस्तानातील मानसिकतेला बळ दिलं आहे. या पक्षाचं कृत्य देशाच्या शत्रूंना आनंद देणारं आहे. शोकमग्न वातावरणात असं वागणं हे हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांचा अपमान आहे, असे बावनकुळे म्हणाले. काँग्रेस पक्षाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणारे चित्र प्रसिद्ध केले आहे. “सर तन से जुदा” ही पाकिस्तानी दहशतवाद्यांची मानसिकता आहे. हीच दहशतवादी मानसिकता काँग्रेस पक्षाने या चित्रातून व्यक्त केली आहे.

Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या आशांवर घाला

काँग्रेस पक्षाच्या या देशविरोधी कृत्याचे पाकिस्तानात स्वागत होत आहे, ही या पक्षासाठी अत्यंत शरमेची बाब आहे. हा या देशातील नागरिकांचा अपमान आहे. या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांच्या बलिदानाचा हा अवमान आहे. दहशतवादी कृत्यामुळे जेवढ्या वेदना या कुटुंबियांना झाल्या नाहीत, त्यापेक्षा कितीतरी अधिक तीव्र वेदना काँग्रेस पक्षाच्या देशविरोधी कृत्यामुळे झाल्या आहेत.

विघटनवादी विचार 

पहलगाममध्ये हल्ल्यानंतर देशात सुरक्षा आणि एकात्मतेवर चर्चा सुरु असताना काँग्रेस पक्षाने विघटनवादी विचारांची झलक दाखवत पंतप्रधानांवर टीका केली आणि त्यांच्या अनुपस्थितीवरून मुद्दा उकरून काढला. काँग्रेसच्या हिणकस पोस्टवर टीका करत भाजपचे नेते गौरव भाटिया म्हणाले, काँग्रेस म्हणजे लष्कर-ए-पाकिस्तान. पाकिस्तानातील टॉवरवरून काँग्रेसला आदेश मिळतात. हा सर्व अजेंडा देशविरोधी आहे.

काँग्रेसच्या या पोस्टवर भाजपचे नेते अमित मालवीय यांनीही घणाघात केला. ते म्हणाले, ही मुस्लिम व्होट बँक डोळ्यासमोर ठेवून तयार केलेली योजना आहे. प्रत्यक्षात काँग्रेसचीच मान कापली गेली आहे. एक दिशाहीन आणि अकार्यक्षम संघटना म्हणूनच ती उरली आहे. देशात दहशतवादाचा मुकाबला करत असताना अशा पोस्टद्वारे काँग्रेसने आपला खरा चेहरा पुन्हा उघड केला आहे. भारताच्या शत्रूंना पाठीशी घालणाऱ्या काँग्रेसला देश कधीच माफ करणार नाही. आता वेळ आली आहे काँग्रेसच्या दुटप्पी आणि धोकेबाज विचारसरणीचा खरपूस समाचार घेण्याची.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!