
काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या माध्यमातून पदवीधरांसाठी गोंदिया जिल्ह्यत रोजगार मेळावा यशस्वीपणे आयोजित केला गेला.
रोजगाराच्या दिशेने प्रत्येक पदवीधराचा प्रवास अनेकदा आव्हानांनी भरलेला असतो. मात्र, या प्रवासाला घातक ठरू नये म्हणून काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी मोठा पाऊल उचलले आहे. त्यांच्या पुढाकारातून आयोजित झालेल्या गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या पदवीधर रोजगार मेळाव्याने हजारो युवक-युवतींना नोकरीच्या नव्या दालनांचा दरवाजा उघडून दिला. यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल, तर स्वत:वरचा विश्वास हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. जग कितीही विरोधात गेले तरीही, तुमचा आत्मविश्वास जर ठाम असेल, तर यश तुमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. असं ज्वलंत आणि प्रेरणादायी प्रतिपादन गडचिरोली-चिमूरचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी गोंदियामध्ये झालेल्या पदवीधर रोजगार मेळाव्यात केलं.
मेळाव्याचं आयोजन काँग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आलं होतं. लकी लॉन, गोंदिया येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला पदवीधर युवावर्गाचा जबरदस्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार अभिजित वंजारी यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किरसान उपस्थित होते. आमदार अभिजित वंजारी म्हणाले, राज्यातील युवकांकडे प्रचंड कौशल्य आहे. परंतु त्यांचं योग्य ठिकाणी मार्गदर्शन होत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी आणि कंपन्यांपर्यंत योग्य उमेदवार पोहोचवण्यासाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनने हे व्यासपीठ उपलब्ध केलं आहे.

National Security : पाकिस्तानातून परतलेली महिला नागपूर पोलिसांच्या ताब्यात
सामाजिक बांधिलकी
वंजारी यांनी स्पष्ट केलं की रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्यांसाठी नव्हे, तर ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांच्यासाठीही पाठपुरावा केला जाईल. संधी चालून आली आहे, ती स्वीकारायची की नाही, हे उमेदवारांनी ठरवायचं आहे, असंही ते म्हणाले. शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी विद्यार्थ्यांना समजावलं की, तुम्ही स्वतःला ओळखा, कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि संवाद कौशल्यासारख्या मूलभूत बाबींपर लक्ष द्या. संधी हवी असेल तर स्वतःमध्ये बदल घडवा मग नोकरीच तुम्हाला शोधत येईल. या मेळाव्यात राज्यभरातील 43 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. निर्मिती, ऑटोमोटिव्ह, आय.टी., बँकिंग, सर्व्हिस, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.
विशेष म्हणजे 516 उमेदवारांना तिथल्यातिथेच ऑफर लेटर प्रदान करण्यात आलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं प्रतिबिंब या उपक्रमाच्या यशस्वीतेचं साक्षीदार होतं. युवकांना एकदा संधी मिळाली की आमचं कार्य संपत नाही, तर त्या यशाचा प्रवास त्यांच्यासोबत चालायचं ही आमची जबाबदारी असल्याचं वंजारी यांनी सांगितलं. गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या मेळाव्याला जिल्हा परिषद सदस्य, महिला आघाडीचे नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनीही रोजगारासाठी युवकांनी आपले कौशल्य विकसित करावे, संवादकौशल्य वाढवावे, आणि कम्फर्ट झोन सोडून नव्या संधी शोधाव्या, अशी सल्ला दिला.
Maharashtra : ज्ञानयज्ञात ज्येष्ठ शिक्षकांची परीक्षा, पुन्हा सिद्ध होण्याची आली वेळ
मेळाव्याच्या माध्यमातून गोविंदराव वंजारी फाऊंडेशनने नोकरीसाठी झगडणाऱ्या अनेक तरुणांना दिशा दाखवली आहे. यश ही एक घटना नसून, सतत चालणारी प्रक्रिया आहे, हेच या कार्यक्रमातून स्पष्ट होतं.