महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : टोमण्यांचं आयुष्य जगणाऱ्यांना महाराष्ट्र ओळखतो

BJP : सोनिया चरणी नतमस्तक होणाऱ्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही

Author

शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पराभवाची हतबलता म्हणून प्रत्युत्तर दिलं.

राज्याच्या राजधानीत 19 जून रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा 59 वर्धापनदिन यंदा पुन्हा एकदा दोन गटांत विभागून साजरा झाला. शिंदे आणि ठाकरे गट या दोन शिवसेनांच्या वेगळ्या सभा एक षण्मुखानंद सभागृहात आणि दुसरी वरळीतील एनएससीआय डोममध्ये पार पडल्या. या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव निर्माण करून गेल्या.या मंचावर उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर घणाघात केला. पनवती लागलेली आहे सरकारला, असं म्हणत त्यांनी देशात झालेल्या दुर्घटनांचा पाढा वाचला.

एअरपोर्टवर गळती, मेट्रोमध्ये पाणी, प्रयागराज आणि दिल्लीतील चेंगराचेंगरी, विमान अपघात आणि कुणीच जबाबदारी घेत नसल्याचा आरोप करत मोदी-शहा जोडीवर निशाणा साधला. आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे, पण हे फक्त भाजपाचे पंतप्रधान आहेत, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरेंनी केली.ठाकरेंच्या टीकेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही संयम न गमावता जोरदार प्रत्युत्तर दिले. हे भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीतून ओकलेली हतबलता होती, असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

Amravati : कृषी समितीच्या माजी संचालकाची गळफास घेऊन आत्महत्या

डिजिटल नेतृत्त्वावर टीका

बावनकुळे यांनी ठाकरेंवर हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही निशाणा साधला. शिवसेना संपली नाही म्हणणाऱ्या उद्धवजींनी आधी ‘सेना’ गमावली आणि मग ‘हिंदुत्व’ व ‘शिव’ही सोनिया गांधींच्या चरणी ठेवले, असा घणाघात त्यांनी केला.मातोश्रीत बसून ऑनलाईन भाषण करणाऱ्यांना मैदानावर उतरणाऱ्या नेत्यांवर आरोप करायचा अधिकार नाही, असं म्हणत बावनकुळे यांनी मोदी, शहा, फडणवीस यांचे दौरे आणि मेहनतीची तुलना उद्धव ठाकरेंच्या ‘डिजिटल’ उपस्थितीशी केली. त्याचबरोबर त्यांनी मुंबईतील विकास कामांची यादी वाचली कोस्टल रोड, मेट्रो, झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि हे सर्व भाजपाच्या पुढाकाराने शक्य झालं असल्याचे ठामपणे सांगितले.

मुंबई आमची म्हणत ओरडून काही होत नाही, असे म्हणत बावनकुळे म्हणाले, मुंबईकरांना आता विकास, सुरक्षितता आणि सन्मान हवा आहे. म्हणूनच त्यांच्या मनात महायुतीचा झेंडा उंच आहे.उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील टीका म्हणजे गरळ ओकणे असल्याचा पुनरुच्चार करत बावनकुळे यांनी सांगितले, लोकसेवा करण्यासाठी तळमळ लागते, जी तुमच्यात नाही. त्यामुळेच आगामी निवडणुकीत जनता तुमचं अपयश शिक्कामोर्तब करणार आहे.एकीकडे उद्धव ठाकरे केंद्र सरकारवर आरोपांचे बाण सोडत असताना, दुसरीकडे बावनकुळे आणि महायुती त्यांच्यावर राजकीय अपरिपक्वतेचा आरोप करत आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन हा साजरा झाला की संघर्षाचा नवा अध्याय, याचं उत्तर भविष्यात मतपेटी देईल.

Akola Airport : ‘वर्षा’तून अकोल्याच्या आकाशात नव्या वाऱ्यांची आशा

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!