महाराष्ट्र

Maharashtra : लोकसभा-विधानसभेचा वाद स्थानिक पातळीवरही रंगणार?

BJP : महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी भूईसपाट होणार

Post View : 54

Author

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या मत चोरीच्या आरोपांना फटकारत, काँग्रेसने सुरुवातीला निवडणूक प्रक्रियेत आक्षेप नोंदवला नसल्याचा मुद्दा उचलला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वादळे सातत्याने उठत आहेत. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोग आणि प्रत्येक पक्ष यांनी आपापल्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. मात्र २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला देखील राजकीय रंगत भरत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आणि भाजपवर मत चोरी झाल्याचा जोरदार आरोप केला आहे.  ज्यामुळे राजकीय चर्चांना आणखी गती मिळाली आहे.

राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट फटकारले आहे. राहुल गांधी यांचे सध्या फक्त खोटे बोला, रटून बोला हेच काम सुरू आहे, असे बावनकुळे म्हणाले. निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक पक्षाचे बूथ स्तरावरील एजंट उपस्थित असतात आणि जेव्हा मतदार यादीवर आक्षेप घेण्याची वेळ होती, तेव्हा काँग्रेसने कोणताही आक्षेप नोंदवला नाही, असा आरोप त्यांनी केला. मग आता निवडणूक हरल्यावर मतदार यादी चुकीची होती अशी टीका सुरू करणे हे फक्त खोटं स्वप्न पाहण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.

Nagpur Traffic : पोलिसांची केवळ चमकोगिरी; साध्या टर्नलाही जागा नाही

बावनकुळेंची भविष्यवाणी

बावनकुळे पुढे म्हणाले, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनीही निवडणूक आक्षेप नोंदवून यशस्वी केली. पण तुम्ही फक्त हार झाल्यावरच अड्डं घेऊ लागलात. त्यांचा आरोप की, १ लाखाहून अधिक बूथवर काँग्रेसच्या नेत्यांनी मतदान प्रक्रियेत कुठेही आक्षेप नोंदवला नाही, मग आता याच गोष्टीवर राजकारण का सुरू?  लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा भुईसपाट होणार असल्याचा खोचक टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे. भाजपा आणि महायुती मिळून ५१ टक्क्यांहून अधिक मतांनी या निवडणुकीत विजय मिळवणार आहेत.

बावनकुळे यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट आवाहन केले की, आताच मतदार यादी तपासा, आक्षेप नोंदवा, नाहीतर पुढे हरल्यावर पुन्हा मतदार यादी चुकली होती अशी तोंडओळख बनवू नका. बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटले की, राहुल गांधी यांना देशाची नाळ कळलेली नाही. विदर्भातील काही नेते त्यांचा सूर आवळत आहेत. या गुड बुकमध्ये राहण्यासाठी त्यांना आव्हान देत आहेत. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या आगामी स्थानिक निवडणुकींमध्ये याच थरारक वादळाचा रंग उमटणार आहे, अशी शक्यता वाढली आहे. राजकारणातील या तप्त वातावरणात, पुढील काही महिने खूपच रोचक ठरणार आहेत. आता पाहायला हरकत नाही, या निवडणुकीच्या रणभूमीवर कोणते नवे ट्विस्ट येतात आणि कोणाची सत्ता टिकते.

Indian Politics : निवडणूक यादीतील निष्क्रिय पक्षांवर आयोगाचा थेट दणका

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!