महाराष्ट्र

उद्धव ठाकरे स्वीकारतील फडणवीस अन् Narendra Modi यांचं नेतृत्व  

संजय राऊतांच्या दाव्यावर Ravi Rana यांचा दावा 

Author

शिवसेना एकनाथ शिंदे गटात लवकरच फूट पडणार असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आता रवी राणा यांनी भाष्य केले आहे. 

राज्यात विधानसभा निवडणूक आटोपली आणि महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर महायुतीत वाद सुरू असल्याची चर्चा वर्तुळात रंगू लागली. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात फूट पडणार असल्याचा दावा केला होता. त्यांनी भाजपवर देखील पक्ष फोडल्याचा आरोप केला होता. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडली गेली, त्याचप्रकारे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात लवकरच फूट पडणार आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.

संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर, बडनेरा आमदार तथा युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांना काहीही कल्पना नाही. ते आधीही अंधारात होते आणि अद्यापही अंधारातच आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठ्या प्रमाणात गुप्त रणनीती सुरू आहे. येत्या काळात उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारतील, असा दावा रवी राणा यांनी केला.

यवतमाळ जिल्ह्याकडे आता तीन Padma Awards

राऊत यांच्या ध्यानी येत नाही 

रवी राणा पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे भविष्यात लवकरच भाजपसोबत दिसतील. ठाकरे यांच्या या निर्णयाने संजय राऊत यांना मोठा धक्का बसणार. फडणवीस आणि ठाकरे यांच्यात सुरू असलेली रणनीती संजय राऊत यांच्या ध्यानी येत नसल्याचे रवी राणा म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवत मुख्यमंत्रीपद सोडलं आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. भाजपसाठी सत्ता आणि स्थिरता महत्त्वाची आहे, अशी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती देखील रवी राणा यांनी केली.

एकनाथ शिंदे गटावर टीका करीत संजय राऊत म्हणाले होते की, सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदेंना खटल्यांचा दबाव होता. शिंदे यांनी स्वतःला वाचविण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यावर प्रत्युत्तर देत रवी राणा म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. फडणवीस यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. हा भाजपचा मोठेपणा दाखवणारा निर्णय होता. जर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता दोन पाऊल मागे येऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवू शकतात. तर आता महाराष्ट्राची सत्ता पूर्णपणे भाजपच्या हातात आहे, त्यामुळे शिंदेंनीही दोन पावलं मागे घेत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले, असे रवी राणा म्हणाले.

संजय राऊत यांनी शिंदे गटात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र रवी राणा यांनी याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली. या चर्चेमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात नवा उलथापालथीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ठाकरे गटातील नेत्यांच्या हालचालींवर आणि भाजपसोबतच्या संभाव्य समीकरणांवर राज्याचं लक्ष केंद्रित झालं आहे. त्यामुळे आता राज्यात कोणती मोठी राजकीय उलथापालक घडते हे पाहावे लागणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!