
विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व विजय प्राप्त झाला. त्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना सोन्याचे मुकुट घालून सत्कार करण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडील जोरदार यश प्राप्त झाले होते. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार असे दृश्य होते. परंतु झाले उलटे आणि भाजप प्रणित महायुतीने धडाकेबाज विजय प्राप्त केला. महायुतीतील भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने मिळून 235 जागांवर विजय मिळवला. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या 49 जागा आल्या.
भाजप 132 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. हा ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सोनेरी मुकुट देऊन स्वागत बावनकुळे यांचे केले होते. आता हा सोनेरी मुकुट चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती भाजपच्या स्वाधीन केला आहे.

महाविकास आघाडीला धक्का; Pen Drive Bomb प्रकरणात चौकशीचा आदेश
क्रेनद्वारे टाकला हार
चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांचे 31 जानेवारी रोजी पहिल्यांदाच अमरावतीत आगमन झाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी भाजप अमरावती शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी सुवर्ण मुकुट चढवत त्यांचा भव्य सत्कार केला. फटाक्यांची आतीषबाजी, फुलांची उधळण करत क्रेनद्वारे हार टाकून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे यावेळी जंगी स्वागत करण्यात आले.
भाजपला मिळालेला विजय हा सर्व कार्यकर्त्यांच्या निष्ठापूर्वक परिश्रमातून मिळाला आहे. त्यामुळे आपण हा सोनेरी मुकुट भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना भेट म्हणून देत आहोत, असे स्पष्ट सांगून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुकुट शहर भाजपाच्या स्वाधीन केले. हा मुकुट किती रुपयांचा आहे याची मला कल्पना नाही. या मुकुटातून येणाऱ्या आर्थिक रक्कमेतून समाजोपयोगी उपक्रमात ही रक्कम खर्च करावी, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती भाजपाच्या कार्यालयात म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक आगळावेगळा आदर्श सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष प्रस्तुत केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचा केलेला हा गौरव सामान्य कार्यकर्त्यांना सुखावून गेला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.