महाराष्ट्र

महाराष्ट्राला आता Union Budget मधून साथ

महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया

Author

देशाचा 2025 वर्षासाठीचा आता संकल्प सादर करण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी अर्थसंकल्पावर निशाणा साधला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2025 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. देशाचा अर्थसंकल्प सादर होताच सत्ताधाऱ्यांनी त्याचे स्वागत केले. तर विरोधकांनी टीकांचे बाण सोडले आहेत. बजेटवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची स्पर्धाच जणू सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लागली आहे. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार सामान्य भारतीयांसोबत ठाममपणे उभे आहे, याचे हे प्रमाण आहे. आज जाहीर झालेल्या योजना व तरतुदी देशाच्या भविष्यकालीन अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या आहेत. भारताचे भविष्याचा हा पाया असणार. भारत जगावर स्वार होईल, इतकी भक्कम तटबंदी या अर्थसंकल्पाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला फार काही महत्त्व नाही. विरोध काणे विरोधकांचे कामच असते, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पेनड्राईव्हमधील भ्रष्टाचाराचे पुरावे; Ajit Pawar यांचा  जबरदस्त एक्शन प्लान!

सर्वंकष Development 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून देशाला नवी गती देण्यासाठी पुढाकार घेतला. देशातील मध्यम वर्गीय, शेतकरी, उद्योग आणि युवकांसाठी अतिशय कल्याणकारी आणि सशक्त समाजाच्या निर्मितीला साथ देऊन सर्वंकष विकास करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून अपेक्षेपलीकडे मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पातून दिलासा दिला. देशातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा अर्थसंकल्प प्रचंड लाभदायक ठरणार आहे. केंद्र शासन राज्यांसोबत भागीदारीमध्ये धन धान्य योजना राबविणार आहे. कापूस विकासाकडे विशेष लक्ष्य देण्यात येणार आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्राला कधी प्रदान करणारे हे बजेट आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

‘स्टार्टअप’च्या बाबतीत महाराष्ट्र देशात सर्वात आघाडीवर आहे. आता स्टार्टअप साठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्टार्टअपसाठी मिळणाऱ्या कर्जामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना प्रस्तावित आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 16 लाख कोटींचे करार केले आहेत. यामुळे महाराष्ट्रात प्रचंड गुंतवणूक होऊन राज्यातील रोजगार मोठ्या प्रमानात वाढणार आहे. आता आपल्याला केंद्रीय अर्थसंकल्पाचीही याला साथ मिळाली आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!