महाराष्ट्र

अकोला महापालिकेत BJP देणार अग्निपरीक्षा

नवीन रणनीती आखण्याची Congress पक्षाला गरज

Share:

Author

विधानसभा निवडणुकीनंतर अकोल्यातील राजकीय समीकरण बदललेले दिसत आहे. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारते की भाजप यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात घमासान पाहायला मिळणार आहे. विकासाच्या मुद्द्यांवरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. दोन्ही पक्षांनी नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे दावे केले आहेत. अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी जोरदार काम करू, असे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक काँग्रेससाठी वादळाची ठरते की भाजपसाठी अग्निपरीक्षा, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

शहरात पूरव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची गुणवत्ता आणि आरोग्य सेवा यांसारख्या मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्याचे भाजपकडून दावे करण्यात येत आहे. भाजपने अकोल्यातील पाणी पुरवठा सुधारण्यासाठी नवा प्रकल्प सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक कचरा प्रक्रिया यंत्रणा स्थापित करण्याची योजना आहे.

विदर्भाच्या विकासासाठी Budget कडून मोठ्या अपेक्षा

काँग्रेसनेही दिले वचन

काँग्रेसकडून शहरी आरोग्य सेवा, कामकाजी वर्गासाठी घरकुल योजना आणि छोटे उद्योजक वाढविण्याचे वचन दिले आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, अकोला शहराच्या दळणवळणाची समस्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, ट्रॅफिक व्यवस्थापन सुधारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी योग्य ते नियोजन आम्ही करू, असे काँग्रेसकडून म्हटले जात आहे.

  1. अकोला महापालिकेत भाजपची सत्ता असूनही महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला ‘शहीद ए वतन हजरत टीपू सुलतान’, असे नाव देण्यात आले होते. ही नामकरणाची शिफारस माजी महापौर आणि अकोला भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली होती. त्यानंतर या निर्णयामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. भाजपमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला होता.

कारवाईमुळे Sand Mafia धुमाकुळाला आळा

लोकसभेत भाजप, विधानसभेत काँग्रेस

अकोला लोकसभा मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी विजय मिळवला आहे. धोत्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या विजयामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपची पकड कायम राहिली आहे. अनुप धोत्रे यांच्या विजयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने भाजपला पराभूत करून विजय प्राप्त केला. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला. काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी 88,718 मते मिळवत विजय संपादन केला. तर भाजपचे विजय अग्रवाल यांना 87,435 मते मिळाली. केवळ 1,283 मतांच्या फरकाने काँग्रेसने भाजपचा धोबी पछाड केला.

बदललेले राजकीय समीकरण

विधानसभेतील विजयामुळे काँग्रेसची अकोला पश्चिम मतदारसंघात पुन्हा आपली पकड मजबूत झाली आहे. या यशाचे श्रेय काँग्रेसच्या प्रभावी प्रचार मोहिमेला, स्थानिक प्रश्नांवर दिलेल्या भराला आणि योग्य उमेदवार निवडीला दिले जात आहे. विधानसभेतील निवडणुकीचे निकाल अकोल्यातील राजकीय चित्र बदलण्यास कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी नव्या रणनीती आखण्याची गरज निर्माण झाली आहे. अकोला महापालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर निर्णय घेणारे मतदार कशा प्रकारे मतदान करतात, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

महाराष्ट्राच्या राजकारणात Nana Patole आणि Praful Patel यांची गळाभेट

अकोला महानगरपालिकेच्या 2007 मधील निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक आणि शहर काँग्रेस अध्यक्ष मदन भारगड यांची महापौरपदी निवड झाली होती. महापौर असताना मदन भरगड यांनी शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले, असा दावा केला जातो. त्यांनी पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि रस्ते सुधारणा यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यांनी शहरातील सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेसाठीही महत्त्वपूर्ण पाऊले उचलली होती, असेही सांगितले जाते.

पण त्यानंतरही अनेक वर्ष काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली. आता अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक भाजप पराभूत झाली आहे. भाजपमधील अनेक नेते दुखावल्यानं हे झालं. पराभवानंतर आजही भाजमध्ये धमकीसत्र सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत काम न करणाऱ्यांना काढण्यात येईल अशी खुलेमआम धमकी दिली जात आहे. यातील काही नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे आहेत. काही दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचे चाहते आहेत. ‘तुमचे लालाजी गेले स्वर्गात. आता आम्हीच आहोत’, असं लालाजींच्या चाहत्यांना सांगितलं जात आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत भाजपचे अनेक कार्यकर्ते अखेरच्या क्षणापर्यंत अलिप्त होते. यातून आतातरी भाजपनं काही तरी शिकावं असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं काँग्रेससाठी अकोला भाजप जिंकणं जितकं अवघड आहे, तितकाच भाजपचा मार्गही खडतर आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!