महाराष्ट्र

BJP : विधान परिषद पोटनिवडणुकसाठी संदीप जोशी रणांगणात

Maharashtra : मतपेटीतून 27 मार्चला बाहेर येणार सत्तेचा भविष्यवेध

Author

भाजपने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकसाठी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने संदीप जोशी यांच्या नावावर अंतिम मोहोर मारली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी पोटनिवडणुक मध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. ही निवडणूक पाच रिक्त जागांसाठी होणार आहे. द लोकहित लाईव्हने सर्वात याबाबत सांगितले आहे.भाजपने संदीप जोशी यांच्या उमेदवारीला अंतिम मंजुरी दिली आहे. भाजपसाठी ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी ही संधी पक्षाने दोन्ही हातांनी स्वीकारली आहे.

भाजपने या निवडणुकसाठी संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केणेकर आणि दादाराव यादवराव केचे यांना उमेदवारी दिली आहे. हे तिन्ही नेते विविध राजकीय आणि सामाजिक पातळ्यांवर प्रभावी कार्यरत आहेत. पक्षाच्या रणनीतीनुसार, या उमेदवारांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राजकीय गणित आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सगळ्यात आधी द लोकहित लाईव्हने सांगितले होते.

Suresh Dhas : सतीश भोसलेच्या घराबाबत एवढी घाई का?

यादी जाहीर

भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या या पोटनिवडणुकसाठी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. विधानसभेतील विद्यमान सदस्यांच्या निवडीमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. निवडणुकीच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात 10 मार्च 2025 रोजी अधिसूचना जारी करून होईल, तर 17 मार्च 2025 ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. 27 मार्च 2025 रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

राजकीय दृष्टिकोनातून पाहता, ही पोटनिवडणूक केवळ विधान परिषदेतल्या पाच जागांसाठी असली तरी ती महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम करू शकते. विशेषतः, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

Mahayuti : लाडक्या बहिणींसाठी निधीमध्ये कपात अन् शिवसेना नेते संतापात

भाजपची रणनीती

भाजपसाठी ही पोटनिवडणूक म्हणजे विधान परिषदेत आपले अस्तित्व अधिक मजबूत करण्याची संधी आहे. राज्यातील स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्ष जोरदार प्रचार करणार आहे. प्रचारादरम्यान, भाजपकडून विकासकामे, हिंदुत्ववादी अजेंडा, तसेच विरोधी पक्षांवरील टीका हे मुद्दे चर्चेत येतील, अशी शक्यता आहे.

विरोधी पक्ष देखील या पोटनिवडणुककडे गांभीर्याने पाहत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष—शिवसेना (उद्धव गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे भाजपला रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाची राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे.

Mahavikas Aghadi : विदर्भाच्या मातीतील सत्ता समीकरणे ढवळणार

आरोप-प्रत्यारोप

निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येतील तसतसे पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. भाजपच्या उमेदवारांसमोर विजय मिळवण्याचे मोठे आव्हान असणार आहे, तर विरोधक आपल्या ताकदीचा वापर करून भाजपला रोखण्याचा प्रयत्न करतील.

यंदाच्या निवडणुकीत पक्षीय गणित, गटबाजी आणि रणनीती निर्णायक ठरणार आहेत. भाजपने उमेदवारांची नावं जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली असली तरी, मविआ आणि इतर विरोधी पक्ष कोणत्या डावपेचांवर भर देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!