महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : भाजपसाठी संविधान बाजूला, बंच ऑफ थॉट्स पुढे

Congress : शिवेंद्रराजे, छत्रपतींचा अपमान का सहन करता

Author

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा आरोप केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जबरदस्त खळबळ उडाली आहे. विशेषतः औरंगाबादमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये ते जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या भाषणांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात औरंगजेबाच्या कबरीबद्दल भाष्य करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजप शिवाजी महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

औरंगजेब हा एक क्रूर शासक होता, ज्याने आपल्या वडिलांना तुरुंगात टाकले, भावाचा खून केला आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबावर अत्याचार केले. परंतु, मराठी माणसाने त्यालाही या मातीत गाढले, हेच शिवरायांच्या विशाल दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपप्रणीत काही प्रवृत्ती औरंगजेबाची कबर उखडण्याची भाषा करत आहेत, मात्र ही एक प्रकारे महाराजांच्या इतिहासाला नष्ट करण्याचीच योजना असल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीच करू नये, पण भाजप प्रायोजित पद्धतीनेच ते घडत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

Sanjay Gaikwad : राजकारण विसरून लग्न सोहळ्यात रमले शिंदे गटाचे आमदार

वारसदारांचा आवाज कुठे

शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधत सपकाळ यांनी विचारलं, छत्रपतींच्या अपमानावर तुम्ही गप्प का? भाजपच्या विचारधारेला लक्ष्य करत त्यांनी सांगितले की, भाजपने कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केलेला नाही. उलट इतिहासात डोकावल्यास, त्यांच्या विचारसरणीने महाराजांचे कार्य लपवले आणि त्यांची समाधी जनतेपासून लपवून ठेवली. महात्मा जोतीबा फुले यांनी ती शोधून काढली, अन्यथा इतिहास विस्मृतीत गेला असता.

भाजप संविधान मानत नाही, ते फक्त सरसंघचालक गोलवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ मानते, असे म्हणत त्यांनी भाजपच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपाने संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे, ते शिवेंद्रराजेंनी वाचावे. तुम्ही महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारमध्ये कसे राहू शकता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Chandrashekhar Bawankule : स्पीड मेट्रोची, सिक्युरिटी पोलिसांची

कोकणात काँग्रेसला संधी

तळकोकणातील राजकारणाचा उल्लेख करताना सपकाळ यांनी सांगितले की, कोकणात काँग्रेसला अनेक मर्यादा आल्या असल्या तरी येत्या काळात पक्ष बळकट करणे हेच ध्येय असेल. कोकणातील सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा सत्ताधारी पक्षांचा कट आहे. येथे सापडणारी खनिजे उद्योगपतींना द्यायची आहेत, आणि त्यासाठी जातीय तेढ निर्माण करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव आखला जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!