महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : भाजपचा विकास म्हणजे उद्योगपतींची श्रीमंती

Congress : कोकणचा किनारा अदानी-अंबानीसाठी राखीव

Author

भाजप सरकार कोकणातील नैसर्गिक संपत्ती अदानी-अंबानींच्या घशात घालण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या लूटमारीचा पर्दाफाश करत शक्तीपीठ मार्गाला सुपर एक्सप्रेस हायवे टू लूट म्हणून हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रातील सागरी किनारा, खनिजसंपत्ती आणि आदिवासी जमिनी उद्योगपतींना आंदण देण्याचे भाजप सरकारचे षडयंत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उघड केले आहे. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा किनारपट्टा, गोव्याचा कोळसा व्यापार आणि कोकणातील खनिज संपत्ती अदानी आणि अंबानी यांच्या स्वाधीन करण्यासाठी भाजप सरकारने शक्तीपीठ मार्ग हा नावाचा दिखावटी प्रकल्प आणला आहे. ह्या प्रकल्पामागचा खरा हेतू कोकण आणि गोव्याच्या नैसर्गिक संपत्तीवर अदानी आणि अंबानींचे वर्चस्व प्रस्थापित करणे आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, कोकण किनाऱ्याला जेट्टीज आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली अदानी-अंबानी यांना सहज व्यापार करता यावा म्हणून हा मार्ग आखला जात आहे. या मार्गाद्वारे देशभरातील खनिज संपत्ती आणि कोळसा गोव्याच्या बंदरातून थेट बाहेर देशांमध्ये निर्यात करता येईल. हा प्रकल्प जनतेच्या विकासासाठी नसून दोन उद्योगपतींसाठी केवळ रेड कार्पेट आहे. कोकणातील स्थानिक नागरिक, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी सरकार वेगवेगळे डाव आखत आहे. सिंधुदुर्गातील काही नेत्यांना पुढे करून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. कोकणच्या जमिनींवर डोळा ठेवून सरकारकडून नवी लूटमार सुरू असल्याचा थेट आरोप काँग्रेसने केला आहे.

Harshwardhan Sapkal : काँग्रेसची शांतता समिती नागपूरच्या मोहिमेवर

फडणवीस सरकार अपयशी

हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारच्या अपयशावर घणाघाती टीका करत सांगितले की, राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, गुन्हेगारी हे सर्व विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. कोयता गँग, रेती माफिया, खंडणी गँग, खोक्यांची देणघेण करणारे दलाल व राज्यातील गुन्हेगारी सत्तेच्या आश्रयाने बहरत आहे. राज्य सरकार गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या हाताखाली महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची दुरवस्था झाली असून, महसुली तूट वाढली आहे. विकासकामांसाठी पैसे नाहीत, पण उद्योगपतींसाठी मात्र भरघोस सवलती आहेत. भाजप सरकारचे मंत्री फक्त नरेंद्र मोदींच्या स्तुतीसाठी व्यस्त आहेत, पण राज्यासाठी विशेष पॅकेज मागण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.

पालघरमध्ये प्रभाव वाढणार

पालघर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाम भूमिका मांडली की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होईल. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात स्थानिक जनतेचा रोष वाढत असून, काँग्रेस त्याचा निश्चित फायदा घेईल. या बैठकीत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला की, भाजपा सरकारच्या उद्योगपती-धार्जिण्या कारभाराविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील लोकशाही आणि आर्थिक न्यायाचे रक्षण करायचे असेल, तर काँग्रेसच हाच पर्याय आहे, असा त्यांचा स्पष्ट संदेश आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!