महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : नागपूरचं रूपांतर आंतरराष्ट्रीय शहरात होणार   

 Social Media : यू-ट्यूबवरील विघातक प्रवृत्तींना आळा घाला  

Author

महाराष्ट्र दिनी नागपूरच्या विकासाची नवी दिशा ठरवत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

महाराष्ट्राच्या 66 स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये ध्वजवंदन आणि भव्य संचलनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली. भाषणात त्यांनी केवळ महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेतला नाही. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घटनांवरही चिंता व्यक्त केली. बावनकुळे यांनी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत राज्यातील ६ नागरिकांचा मृत्यू ही 140 कोटी भारतीयांसाठी वेदनादायक बाब असल्याचे म्हटले.

कश्मीरसाठी आणि पर्यटन क्षेत्रासाठी तो दिवस दुर्दैवी होता. मात्र, महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन इतके सक्षम आहे की, प्रत्येक पाकिस्तानी गुन्हेगाराला शोधून काढले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकत्र आल्याने भाषणात कामगारांसाठीच्या निर्णयांनाही महत्त्व मिळाले. मोदी सरकारने 1948 नंतर पहिल्यांदाच जातीय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा लाभ मिळेल, असे ते म्हणाले. यासोबतच, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार समाजासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

Bhandara : वैनगंगा नदीला पूर आला, पण मदत मात्र महसूल सेवकाच्या घरात

शिक्षणात क्रांतिकारी बदल

शैक्षणिक क्षेत्रातही मोठे बदल होत आहेत. 2047 पर्यंत नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक स्तरावर कुशल मनुष्यबळ तयार होईल, असा दावा बावनकुळे यांनी केला. मुलांच्या शिक्षणासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज भासणार नाही आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन योजनेमुळे कुठेही बसून रजिस्ट्रेशन करता येईल. बावनकुळे यांनी नागपूर शहराच्या विकासाची रूपरेषा स्पष्ट करत सांगितले की, पुढील पाच वर्षांत नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होईल. नागपूरमध्ये सामाजिक तेढ पसरवणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.

पाकिस्तानमधील चॅनेल्सवर केंद्र सरकारने घेतलेल्या कारवाईचा उल्लेखही त्यांनी केला. नागपूरमध्ये छोट्या क्लिप्सद्वारे संभ्रम निर्माण करणाऱ्या प्रभावशाली लोकांवर देखील लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी नागरिकांनीही जागरूक राहावे, असे त्यांनी सुचवले. बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना शंभर दिवसांत कोणत्या सुधारणा शक्य आहेत याचा कार्यक्रम दिला आहे. महसूल खात्यातील 24 सुधारणा लवकरच पूर्ण केल्या जातील.

Ajaz Khan : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही थांबला नाही अश्लीलतेचा कंटेंट 

डबल इंजिन सरकार

सिंधू करार थांबवण्याचा कणखर निर्णय मोदींनी घेतला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दोन हजार संशयित ताब्यात घेण्यात आले आहेत. शासनाच्या योजनांची अंमलबजावणी ही आमची प्राथमिकता आहे, असे सांगताना त्यांनी महिलांसाठी मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना शाळेतच सर्व सुविधा, आणि छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अशा विविध उपक्रमांची माहिती दिली. कामगार दिनानिमित्त बावनकुळे यांनी कामगारांच्या कल्याणासाठी मोदी आणि फडणवीस सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. डबल इंजिन सरकार हे केवळ विकासासाठी नाही, तर लोकांच्या जीव व मालमत्तेच्या रक्षणासाठी देखील कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

मराठा जात नोंदीसंदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, जातीय जनगणना झाल्यावर राज्यातील अस्थिरता संपेल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे श्रेय त्यांनी मोदींना दिले आणि जयंत पाटील यांच्यावर टीका करत म्हटले, गेल्या पाच वर्षात त्यांनी काय केलं.

Nagpur : अतिक्रमण हटवणाऱ्या महापालिकेवर पोलिसांच्या कराचे ओझे   

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!