महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सिंह जागा आहे, पण गर्जना योग्य वेळी 

Raj - Uddhav Thackeray Alliance : फडणवीस म्हणाले, खेळ अजून सुरूच

Author

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमध्ये वाढती जवळीक आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. ‘ठाकरे बंधू’ पुन्हा एकत्र येणार का, यावरून राज्यात चर्चांचा भडका उडाला आहे.

महाराष्ट्रात सत्तेच्या पडद्यामागे हलवले जाणारे राजकीय डावपेच सध्या चांगलेच रंगू लागले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील संभाव्य जवळीक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ज्यांना एकेकाळी एकत्र पाहणे अशक्य वाटायचं, त्यांच्याबाबत आता ‘पुन्हा एकत्र’ अशी राजकीय कुजबुज सुरू आहे. हे सगळं घडत असताना, या युतीविषयी काही बोलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सावध भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी नक्षलविरोधी लढ्यात मोठं यश मिळाल्याचंही जाहीर केलं.

राजकारणात कोणतंही गणित कायमचं नसतं, आणि सध्या महाराष्ट्रात हेच चित्र दिसतंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र येणार, अशी शक्यता अनेक दिवसांपासून बोलली जात आहे. नुकतेच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते लवकरच होणार. आता संकेत नाही, थेट बातमीच देतो” असं म्हणत एक खळबळजनक सूचक विधान केलं. या विधानाने शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमध्ये खरोखरच काही हालचाली सुरू आहेत का, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

माझ्याशी संबधित नाही 

राज ठाकरे – उद्धव ठाकरे या दोघांच्या संभाव्य युतीविषयी विचारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीत पत्रकारांशी बोलताना सावध प्रतिक्रिया दिली. मी यावर आत्ताच काही बोलणार नाही. ही युती माझ्याशी संबंधित नाही. माझा राजकीय अनुभव काय सांगतो, हे मी योग्य वेळी बोलेन, असं सांगत त्यांनी संभाव्य युतीबाबत उत्सुकता अधिकच वाढवली.

याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारणा झाली. पुण्यात आयोजित क्रेडाईच्या कार्यक्रमात उपस्थित असताना, पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न विचारला. मात्र शिंदेंनी हात जोडत कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. फक्त, महायुती मजबूत आहे, आणि तीच जिंकणार, इतकंच म्हणत ते निघून गेले. त्यांच्या या मौनामध्येही एक प्रकारचा राजकीय संकेत दडलेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Akola : दलित वस्ती निधीवर सावरकर-देशमुख यांच्यात घमासान

ऐतिहासिक आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलप्रवण भागात सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांची उपस्थिती केवळ औपचारिक नव्हती, तर तेथील नक्षलप्रवृत्त भागात एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. या कार्यक्रमात 12 नक्षलवाद्यांनी शस्त्रासह आत्मसमर्पण केलं.

विशेष म्हणजे, आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये नक्षल चळवळीतील ‘डीव्हीसीएम’ पदावर कार्यरत असलेल्या अंजू आणि सरिता या दोन महिला माओवादी नेत्या देखील होत्या. या दोघींनी एके-47 रायफलसह आत्मसमर्पण करत संविधानाची प्रत स्वीकारली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांचे स्वागत केले आणि त्यांना संविधानाची प्रत देऊन नवजीवनाचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रेरित केलं.

माओवादमुक्त होण्यार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षलविरोधी पथकातील जवानांशी संवाद साधत त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांत माओवादी चळवळीला खिळखिळं करणं हे पोलिस दलाचं मोठं यश आहे. आज गडचिरोलीत फक्त 40 माओवादी उरले आहेत. हे या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठं पाऊल आहे.

एकीकडे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार की नाही, यावर चर्चा रंगत असताना दुसरीकडे महाराष्ट्र सरकार नक्षलविरोधी कारवाईत मोठं यश मिळवत आहे. या दोन परस्परविरोधी घटनांमध्ये महाराष्ट्राचं भवितव्य नेमकं कोणत्या वळणावर जाईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राजकारणात मैत्रीचे क्षण आणि युतीचे निर्णय अचानक घडतात, पण सुरक्षा आणि स्थैर्याचे निर्णय नियोजनातून उभे राहतात आणि सध्या महाराष्ट्रात दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!