देश

Nitin Gadkari : पंधरा ऑगस्टपासून फास्टॅग फ्रीडम

FASTag : तीन हजारांत वर्षभराचा प्रवास मोकळा

Author

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक नवी योजना लागू केली आहे.

नागरिकांना राष्ट्रीय महामार्गांवर अधिक सुलभ, जलद आणि खर्चिक दृष्टिकोनातून फायदेशीर प्रवास करता यावा यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक क्रांतिकारी योजना जाहीर केली आहे. येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून खासगी वाहनांसाठी FASTag आधारित वार्षिक पास लागू होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ही नवीन योजना केवळ ‘सोयीची’ नसून ‘बचतीची’ देखील ठरणार आहे. कारण वाहनधारकांना आता वारंवार FASTag रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.

कार, जीप आणि व्हॅनसारख्या खासगी वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या या वार्षिक पासची किंमत फक्त तीन हजार रुपये असणार आहे. एकदा सक्रिय केल्यावर हा पास एक वर्ष किंवा 200 ट्रिप्सपैकी जे आधी पूर्ण होईल तेवढा कालावधी वैध असेल.या योजनेच्या माध्यमातून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वारंवार टोल भरावा लागणार नाही आणि त्यासाठी रिचार्ज करावा लागणार नाही. ही योजना केवळ ‘एक शहर ते दुसरं’ नव्हे, तर ‘एक राज्य ते दुसरं’ सहज आणि निर्बंधांशिवाय जोडण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Chintaman Vanjari : बनावट अपंगत्वाचा सेकंड पार्ट उपराजधानीत रिलीज

गर्दीला स्मार्ट ब्रेक

आता एखाद्या परिवाराचा गाडीतून लांबचा प्रवास असो किंवा व्यावसायिक कारणासाठी दर आठवड्याला राज्यांदरम्यान प्रवास करणारे वाहनधारक असोत सर्वांसाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे. FASTag वापरणाऱ्यांसाठी योजनेचा पर्याय त्यांच्या विद्यमान खात्यातूनच निवडता येईल. यामुळे नवीन खाते उघडण्याची गरज नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वेबसाइटवर किंवा हायवे ट्रॅव्हल अॅपवर हा पास खरेदी करता येईल. यामुळे प्रक्रिया अधिक सोपी व डिजिटल होणार आहे.पूर्वी केंद्र सरकारकडून ‘लाइफटाइम FASTag पास’ आणण्याचा प्रस्ताव होता. ज्यासाठी 30 हजार रुपयांचं एकरकमी शुल्क आकारण्यात येणार होतं.

आता तो प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी 3 हजार रुपयांत वर्षभर चालणारा आणि जास्त व्यावहारिक पर्याय सरकारनं सादर केला आहे. या योजनेमुळे टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल, कारण प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र रिचार्ज प्रक्रिया किंवा थांबणं आवश्यक नसेल. परिणामी, प्रवाशांचा वेळ वाचेल आणि इंधनही बचतीत येईल. एकंदरीत, ही योजना राष्ट्रीय महामार्गांवरील ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकते. या क्रांतिकारी पावलामुळे भारतातील महामार्ग प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे. ज्याप्रमाणे रेल्वेसीझन पास प्रवाशांसाठी फायदेशीर ठरतो, तसाच ‘हायवे पास’ आता वाहनधारकांसाठी नवा प्रवास-संस्कार निर्माण करणार आहे. 3 हजार रुपयांत वर्षभर प्रवास, तोही टोलमुक्त हे आता स्वप्न राहिलेलं नाही, तर 15 ऑगस्टपासून वास्तव होणार आहे.

Prataprao Jadhav : मोदींच्या विजयाचे गोपनीय भागधारक शरद पवार

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!