महाराष्ट्र

Prakash Ambedkar : जातीय हिंसेशिवाय भाजप-आरएसएसचे अस्तित्व शक्य नाही

Nagpur Riot : भडकले शब्द, पेटला शहर, फहीम खानचा वादग्रस्त ठसा

Author

नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या दंगलीमुळे संपूर्ण राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर सध्या एका संवेदनशील प्रकरणामुळे धगधगत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय पटलावर औरंगजेबाच्या मुद्द्याने वातावरण तापवले आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबावर केलेल्या टिप्पणीमुळे सुरू झालेली ही वादाची ठिणगी आता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे. हा मुद्दा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर उत्तर प्रदेशनंतर बिहार, आणि बिहारमधून पार्ट एकदा त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या मातीत उमटत आहेत.

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून नागपुरातील तणाव अधिकच वाढल्याने प्रशासनाला संचारबंदी लागू करावी लागली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सरकारला धारेवर धरले. त्यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधत, या संघटनांवर जातीय द्वेष आणि हिंसाचार पसरवण्याचा आरोप केला. ‘जातीय द्वेष आणि हिंसेच्या आगीत भाजप आपल्या राजकीय स्वार्थाची भाकरी भाजत आहे.’ त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, भाजप आणि आरएसएसचे अस्तित्वच जातीय हिंसा आणि द्वेषाशिवाय टिकू शकत नाही. आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी हे मत व्यक्त करत भाजप सरकारवर गंभीर आरोप लावले.

Shashikant Shinde : कल्याणमध्ये अन्यायाची चिखलफेक

विरोधक आक्रमक

नागपुरातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या नऊव्या दिवशी विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाने जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे शहरात तणाव निर्माण झाला आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. निषेध रॅलीदरम्यान तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाल्याने शहरात गोंधळ उडाला. पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती अधिकच चिघळली. यामुळे सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नागपूरमध्ये वाढत्या तणावामुळे पोलिसांनी काही भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तसेच, या घटनेशी संबंधित तीन पोलीस ठाण्यात सहा एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अल्पसंख्याक डेमोक्रेटिक पार्टीचा (MDP) नगर अध्यक्ष फहीम खान प्रमुख आरोपी म्हणून समोर आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हिंसा भडकण्याआधी फहीम खानने याचे पूर्वनियोजन केले होते, ज्यामुळे वातावरण अधिक तापले.

Manisha Kayande : सरकारी वीजनिर्मिती थंड, खासगी मात्र धगधगती 

मुख्यमंत्र्यांच्या गडात अस्वस्थता

नागपुरात घडलेल्या या प्रकारामुळे केवळ नागपूरच नाही, तर संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्र अस्वस्थ आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यात असे दंगलीचे प्रकार घडल्याने सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत आणखी अटकसत्र होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, आगामी राजकीय हालचाली काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!