महाराष्ट्र

रवींद्र चव्हाण महाराष्ट्र BJP प्रदेश प्रभारी

प्रदेशाध्यक्ष Chandrashekhar Bawankule यांची घोषणा

Share:

Author

Views: 24156

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यांचा उत्तराधिकारी अद्याप नियुक्त करण्यात आलेला नाही. अशात रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र भाजपचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

महायुती सरकारमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळं भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे देखील मंत्री झाले आहेत. त्यामुळे बावनकुळे आणि शेलार यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेक नेत्यांची नावं चर्चेत असताना भाजपनं शनिवारी (28 डिसेंबर) रवींद्र चव्हाण यांची प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारी म्हणून चव्हाण काम करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती होईपर्यंत चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षांप्रमाणे चव्हाण यांना अधिकारी बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळं तूर्तास महाराष्ट्र भाजपमध्ये दोन नेते प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणार असल्याचं चित्र आहे.

आधी होते PWD Minister

महायुती सरकारमध्ये रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण चवथ्यांना विजयी झाले आहेत. विजयानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं. नगरसेवक ते प्रदेश प्रभारी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. चव्हाण 2007 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक होते. त्यानंतर ते महापालिकेत स्थानी समितीचे सभापती देखील होते. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत ते आमदार झालेत.

ठाकचंदची Tumsar Mohadi मध्ये ‘ठाकूर’की

रवींद्र चव्हाण यांच्या कामामुळं भाजपला कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, उल्हासनगर येथे यश मिळालं. ठाणे, पनवेल महापालिकेतही भाजपचं वर्चस्व वाढलं. कर्जत, माथेरान, बदलापूरमध्येही पक्षाला यश मिळविता आलं. त्यामुळं त्यांना सरकारमध्ये राज्यमंत्री करण्यात आलं होतं. 2019 मध्ये त्यांनी आमदारकीची हॅट्‌ट्रिक केल्यानं त्यांना बांधकाम मंत्री करण्यात आलं. पालघर आणि सिंधुदुर्गचे ते पालकमंत्री देखील होते. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर येथे त्यांनी भरीव कामगिरी केली.

Konkan मध्ये सुरूंग

उद्धव ठाकरे यांचा गड असलेल्या कोकणात चव्हाण यांनी भाजपची ताकद वाढवली. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाला. मात्र त्यांना यंदा मंत्रिमंडळात घेण्यात आलं नव्हतं. त्यांचं नाव अनेक दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होतं. आता त्यांना बावनकुळे यांच्या समकक्ष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!