महाराष्ट्र

भाऊ!! Bhandara मध्ये नोकरी हवी? 40 लाख तयार ठेव

एका एजन्सीकडून शंभरावर पदांसाठी ठरला रेट

Share:

Author

मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची संख्या भंडाऱ्यात आहे. अशा परिस्थितीत या जिल्ह्यात एक मोठी नोकर भरती करण्यात येत आहे. या भरतीचं काम एका एजन्सीला देण्यात आलं आहे. या एजन्सीकडून प्रत्येक उमेदवाराचे दर ठरविण्यात आले आहेत.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात लवकरच एका पदासाठी कायमस्वरूपी नोकर भरती होणार आहे. सुमारे शंभरावर जागांसाठी ही नोकर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी आता ‘रेट फिक्स’ करण्यात आले आहेत. दोन वर्गवारीत ही नोकर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर नेमणूक करण्यासाठी किती रक्कम घ्यायची हे निर्धारित करण्यात आलं आहे. एका पदासाठी कमीत कमी 25 लाख रुपये घेण्यात येणार आहे. दुसऱ्या पदासाठी कमीत कमी 40 लाख रुपये घेण्यात येणार आहेत. या भरती घोटाळ्याबद्दल लोकप्रतिनिधी देखील मौन राहणार आहेत. त्याचं कारण म्हणजे लोकप्रतिनिधींचे नातेवाईक देखील या घोटाळ्यातून कायमस्वरूपी नोकरीला लागणार आहेत. कोणी किती उमेदवार आणायचं हे देखील ठरलेलं आहे.

काही जणांना कमीत कमी दोन उमेदवार घेऊन येण्याचं सांगण्यात आलं आहे. हा सगळा घाट एका एजन्सीकडून घालण्यात आला आहे. उमेदवारांकडून पैसे जमा करण्याची जबाबदारी दोन जणांवर सोपविण्यात आली आहे. यातील एक व्यक्त ‘कैलास’वर बसून पैसे गोळा करीत आहे. दुसऱ्या व्यक्तीला तर पैसे गोळा करण्यासाठी सगळ्यांनीच ‘अभय’ दिलं आहे. त्यामुळं या भरतीतून ‘सबका साथ, सबका विकास’ होणार आहे. भरती प्रक्रिया होण्यापूर्वीच उमेदवारांची ‘कन्फर्म लिस्ट’ तयार झाली आहे. ही यादी ‘द लोकहित लाइव्ह’च्या हाती आली आहे.

महाराष्ट्रात March End पर्यंत मिळणार नवीन भाजप प्रदेशाध्यक्ष 

Permenant Job साठी काहीही

निवडलेल्या उमेदवारांना नोकरी लावून देण्याची जबाबदारी या एजन्सीवर सोपविण्यात आली आहे. ही एजन्सी संपूर्ण नोकर भरती प्रक्रिया राबविणार आहे. त्यामुळं ‘फिक्स’ झालेल्या उमेदवारांची नावं एजन्सीला मिळाली आहेत. यामध्ये एजन्सी देखील आपल्या कोट्यातून काही उमेदवार नोकरीत लावणार आहेत. त्यामुळं एजन्सी मालामाल होणार आहे. भंडारा जिल्ह्यात बेरोजगार तरूणांची संख्या मोठी आहे. यातील अनेक तरूणांना या एजन्सीकडून संपर्क साधण्यात आला आहे. ही नोकरी कायमस्वरूपी आहे. त्यामुळं ‘पर्मनंट जॉब’ मिळत असल्याचं आमिष उमेदवारांना दाखविण्यात येत आहे. कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळंच कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांची मागणी उमेदवारांना करण्यात येत आहे.

रकमेची देवाण-घेवाण करण्यासाठी एजन्सीकडून काही लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या हे मध्यस्थ एजन्सीच्यावतीनं उमेदवारांसोबत तडजोड करीत आहेत. तडजोड करणारे व्यक्ती कायमस्वरूपी नोकरीची हमी घेत आहेत. संबंधित उमेदवार आणि मध्यस्थ यांच्या व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून संवादही झाला आहे. यासंदर्भातील अनेक ठोस पुरावे ‘द लोकहित लाइव्ह’च्या हाती लागले आहेत. त्यामुळं संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच यादी कशी काय तयार होऊ शकते, असा संभ्रम निर्माण झाला आहे. ‘द लोकहित लाइव्ह’ जवळ असलेली यादी आणि निवडण्यात आलेल्या उमेदवारांचं नाव सारखे असल्यास हा घोटाळा कोट्यवधी रूपयाचा असल्याचं स्पष्ट होणार आहे. या भरती प्रक्रियेत केवळ पात्र उमेदवारांची निवड करण्याची मागणी आता केली जात आहे. असं न झाल्यास भरती घोटाळ्याचा भंडाफोड होण्याची वेळ दूर नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!